Thursday, May 13, 2021

REVENGE

 






An old man said these words to Noam Chomsky, who reported it in 2012: “You take my water, burn my olive trees, destroy my house, take my job, steal my land, imprison my father, kill my mother, bombard my country, starve us all, humiliate us all, but I am to blame: I shot a rocket back.”
In 2006, Palestinian poet Talha Muhammad Ali wrote this poem, one that has stayed with me always since I first read it a decade ago.
Between these two is contained the breadth and the fire of the Palestinian resistance, and in its refusal to be erased either from the geopolitics of this earth and from the human condition and the individual call to humanity itself, it can never be exterminated.
#FromtherivertotheseaPalestinewillbefree
_________
इन्तेक़ाम
तहा मुहम्मद अली
कभी कभी... जी चाहता है कि
मैं उस आदमी से भिड़ सकूँ
जिसने मेरे वालिद का क़त्ल किया
और मेरे घर को ढाकर, मुझे
एक तंग से देश में खदेड़ दिया.
अगर वो मुझे मार डाले
तो मुझे आख़िरकार सुकून मिले,
और अगर मेरी पूरी तैयारी हुई--
मैं उससे बदला लूंगा.
*
पर अगर, जब मेरा दुश्मन मेरे सामने आये,
यह उजागर हो,
कि उसकी एक माँ है जो उसका इंतेज़ार कर रही है
या एक पिता जो
दाएं हाथ से अपना सीना थाम लेता हैं
अगर उनका बेटा पंद्रह मिनट भी उनकी मुलाक़ात के लिए देर से आये
तब मैं उसकी हत्या नहीं करूँगा
पाऊँ भी तो.
*
जैसे ही... मैं उसका क़त्ल नहीं करूँगा
अगर ये जल्द ही साफ़ हो जाय कि
उसके भाई या बेहेन हैं
जो उस से बेहद प्यार करते हैं
और उसे देखने की लिए तड़पते रहते हैं
या उसकी एक बीवी है जो उसका सत्कार करती है
या बच्चे जो उसकी नमौजूदगी बर्दाशत नहीं कर सकते
और जिन्हें उसके तोहफे भरपूर ख़ुशी देते हैं.
या अगर उसके हों कोई दोस्त या पड़ोसी
या जेल या हस्पताल के कोई रफ़ीक़
या स्कूल के कोई सहपाठी
जो लेते रहते है उसकी खबरें
और भेजते रहते हैं उसको सलाम.
*
पर अगरचे वो बिलकुल अकेला ही निकला
— पेड़ से कटी हुई शाख़ की तरह अलैहदा--
— बिन माँ-बाप के, कोई भाई-बेहेन नहीं,
पत्नीविहीन, बिना कोई बच्चे के,
और रिश्तेदारों, पड़ोसी, दोस्तों, सहयोगियों, साथियों के बग़ैर,
मैं उसकी एकाकी के दुःख में एक ज़र्रा भी नहीं जोड़ूंगा—
न तो मौत की अज़ाब
न तो गुजर जाने का ग़म.
इसके बदले, में संतुष्ट रहूंगा
उसे कोई ध्यान न देते हुए उसके पास से गुज़र जाऊंगा
—अपने आप को मनाते हुए कि
उसे ऐसे नज़रअंदाज़ करना
अपने आप में एक किस्म का इन्तेक़ाम है.
(Translated by Ayesha Kidwai, May 2020)
_____________
REVENGE
Taha Muhammad Ali
2015
At times ... I wish
I could meet in a duel
the man who killed my father and razed our home, expelling me
into
a narrow country.
And if he killed me,
I’d rest at last,
and if I were ready—
I would take my revenge!
*
But if it came to light, when my rival appeared, that he had a mother waiting for him,
or a father who’d put
his right hand over
the heart’s place in his chest whenever his son was late even by just a quarter-hour for a meeting they’d set— then I would not kill him, even if I could.
*
Likewise ... I
would not murder him
if it were soon made clear
that he had a brother or sisters
who loved him and constantly longed to see him. Or if he had a wife to greet him
and children who
couldn’t bear his absence
and whom his gifts would thrill.
Or if he had
friends or companions,
neighbors he knew
or allies from prison
or a hospital room,
or classmates from his school ... asking about him
and sending him regards.
*
But if he turned
out to be on his own—
cut off like a branch from a tree— without a mother or father,
with neither a brother nor sister, wifeless, without a child,
and without kin or neighbors or friends, colleagues or companions,
then I’d add not a thing to his pain within that aloneness—
not the torment of death,
and not the sorrow of passing away.
Instead I’d be content
to ignore him when I passed him by
on the street—as I
convinced myself
that paying him no attention
in itself was a kind of revenge.
(Translated by Peter Cole, Yahya Hijazi, and Gabriel Levin, 2015)
Hindi in Roman
Inteqaam
Taha Muhammad Ali
Kabhi kabhi... ji caahtaa hai
Main us aadmi se bhiR sakuun
Jisne mere waalid ka qatl kiyaa
Aur mere ghar ko dhaakar, mujhe
Ek tangg se desh mein khadeR diya
agar wo mujhe maar daale
To mujhe aakhirkar sukuun mile
Aur agar merii puurii taiyyari hui
Main us de badlaa luungaa.
*
Par agar, jab meraa dustman mere saamne aaye, ye ujaagar ho
ki uskii ek maaN hai jo
uskaa intezaar kar rahi hai
Ya ki ek pitaa jo
Daayein de apnaa siinaa thaam letaa hai
agar unkaa beTaa pandraah minit bhi unki mulaakat ke liye der de aaye
Tab main uskii hatyaa nahiin karungaa,
PaauuN bhi to.
*
Jaise ki... main uska qatl nahiin karuunga
Agar ye jald hi saaf ho jaaye ki
uske bhaii ya behen hain
jo us se behad pyaar karte hain
Aur use dekhne ke liye taRapte rehte hain
Ya uski ek biwi hai jo uska satkaar karti hai
Ya bacce, jo uski namaujudagi bardasht nahiin kar sakte
Aur jinhein uske tohfe bharpuur khushi dete hain.
Ya agar uske hoN koi dost ya paRosi
Ya jel ya haspatal ke koi rafiq
Ya skuul ke koi sahpaathi
Jo lete rehte hain uski khabrein
Aur bhejte rehte hain usko salaam
*
par agarche vo bilkul akela hi niklaa
— peR de kati hui shaakh ki tarah, alayhdaa
— bin maaN-baap ke, koi bhai-behen nahiin
Patni viheen, binaa koi bacce ke
Aur rishredaaroN, paRosiyoN sahyogiyoN, saathiyoN ke baghair
Main uski ekaaki ke dukh mein zarra bhi nahiin joRungaa
— naa to mauth ka aazaab
Naa to guzar jaane kaa gham.
Iske badle, main santusht rahuungaa
Use koi dhyaan na dete hue uske paas de guzar jaaungaa
--apne aap ko manaate hue ki
Use aise nazarandaaz karnaa
Apne aap mein ek kism ka inteqam hai

Saturday, May 1, 2021

LAUGHTER SHOW

 


पेशंट : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.... 


डॉक्टर: "अहो त्या गोळ्या नाहीयेत. 

मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!


पेशंट: अबे बयताडा... त्या गोळीच्या नादात 52 मेडिकल फिरलो ना मी बोक्या 

तरीपण एक - मेडिकल वाला म्हणला उद्या मागवून देतो . 

" निसर्ग मित्र व्हा "

 भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.


एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳आता नाही तर कधीच नाही.

🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने

पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।

 " निसर्ग मित्र व्हा "

गुजरात मॉडेलने देशाला पंतप्रधान दिला महाराष्ट्राने देशाला काय दिले?



Dailyhunt

Source : "Max Maharashtra"

 महाराष्ट्र राज्याच्या नावातच राष्ट्र आहे तसे भारतातल्या इतर कुठल्याही राज्याच्या नावात नाही. त्यामुळे राष्ट्राला दिशा देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी इतर राज्यांच्या तुलनेत मोठी आहे आणि महाराष्ट्र ती गेल्या साठ वर्षांपासून यशस्वीरित्या निभावतोय. हे 'नावात काय आहे?' या शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध वाक्याला फाट्यावर मारत आपण महाराष्ट्रीयन लोक अभिमानाने म्हणू शकतो. आज 'महाराष्ट्र दिन', महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. त्यानिमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!!

साधारण एक नऊ-दहा वर्षांपूर्वी अचानक 'गुजरात मॉडेल'ची जाहिरातबाजी सुरू झाल्याचे आपणा सर्वांना आठवत असेल.


मोदींच्या नेतृत्वात गुजरातने इतर राज्यांच्या तुलनेत कशी प्रगती केली आणि तशीच प्रगती देशाची व्हायची असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. अशी हवा २०१३ सालापर्यंत तयार करण्यात आली आणि परिणामस्वरूप मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले आणि २०१४ साली बहुमत मिळवून भारताचे पंतप्रधानही झाले. हा इतिहास मी यासाठी सांगतोय की, तथाकथित 'गुजरात मॉडेल' ची वाहवा होत असताना, त्यापूर्वी, त्यानंतर आणि आजही आपला महाराष्ट्र गुजरातच्या बराच पुढे होता आणि आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात जास्त होता आणि आजही आहे.


औद्योगिकरणातही महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता आणि आहे. अशा प्रगतिशील महाराष्ट्र राज्याने किंवा राज्याच्या नेतृत्वाने कधीच आपली टिमकी न वाजवता म्हणजे जाहिरातबाजी न करता कायम पुढे जाण्याचे धोरण ठेवले.


मोदींच्या जाहिरातबाजीला देश भुलला आणि त्यांना सत्ता दिली.


अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, मिनीमम गवर्नमेंट मॅक्सीमम गवर्नंस, आतंकवाद-नक्सलवाद से निपटारा, भ्रष्टाचारमुक्त भारत, चीन-पाकिस्तानको सबक, घरमे घुसके मारेंगे, विश्वगुरु.......वगैरे वगैरेचा फुगा फुटला आणि 'कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन' असे म्हणायची वेळ आपल्या सर्वांवर आली. हे मी सर्व यासाठी सांगतोय की, महाराष्ट्रात अनेक उत्तुंग नेते होऊन गेले, ते देशपातळीवरही गाजले, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने निरनिराळ्या पदांवरील कारकीर्द गाजवली.


१९६२ च्या चीनयुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला' असे म्हटले गेले. पुढे महाराष्ट्रातून अनेक नेते केंद्रात अनेक मोठमोठी महत्वाची मंत्रीपदे, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, लोकसभेचे सभापतीपद, राष्ट्रपतीपद भूषवून महाराष्ट्राचे देशासाठी योगदान देऊन गेले आणि अजूनही देत आहेत. इथे सगळ्यांची नावे द्यायची गरज नाही कारण महाराष्ट्रातील जागरूक वाचकांना हे सर्व नेते माहित आहेत.


मुद्दा असा आहे की, ही सर्व थोर नेतेमंडळी, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती, त्यांचे नियोजन, सर्वसमावेशक धोरण, विरोधी नेत्यांचेही ऐकून घेण्याची वृत्ती, वगैरे सर्व आपण ऐकले किंवा वाचले आहे. या पार्श्वभूमीवर आजचा महाराष्ट्र कुठे आहे? हे महाराष्ट्र दिनानिमित्त अभ्यासणे औचित्यपूर्ण ठरेल.


गेल्या जवळपास दीड वर्षापासून जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या बघता हे संकट जास्तच गंभीर आहे. या संकटात तथाकथित 'गुजरात मॉडेल' च्या भूलभुलैयाला बळी पडून भारतीय जनतेने ज्या महान नेत्याच्या हातात देशाचा कारभार दिला, त्या नरेंद्र मोदींच्या हातात संपूर्ण राज्यकारभार आहे.


कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सर्वाधिकार त्यांनी आपल्याकडे घेऊन घेतले आहेत. 'सबका साथ सबका विकास' अशी दिलखेचक घोषणा करणारे आदरणीय मोदीजी लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसीवीर किंवा इतर आवश्यक औषधांचा पुरवठा, अशा अति महत्वाच्या बाबतीत राज्याराज्यांत कसा भेदभाव करतात हे दिसून येत आहे.


महाराष्ट्राच्या बाबतीत तर शत्रुत्वाचीच भावना असल्यासारखे केंद्र सरकार आणि भाजपा नेते (केंद्रातील आणि राज्यातील) वागत आहेत. घोषणा करून टाकायची आणि नियोजन नंतर करायचे हे मोदी सरकार २०१४ पासून सातत्याने करत आहे. आणि कोरोना काळात तर ते पदोपदी जाणवत आहे. लसीकरण कार्यक्रमाचा फज्जा आपण सर्व बघतच आहोत. घोषणा आणि जाहिरातबाजी..... नियोजन शून्य....... परिणाम गोंधळ आणि फक्त गोंधळ.


रेमडेसीवीरबाबत फडणवीस आणि विखे यांचे प्रकरण झाले, दिल्लीत गौतम गंभीरचे प्रकरण झाले. हे सर्व भाजपाचेच नेते असावेत हा एक योगायोग. विचार करा, कोरोना काळात केंद्रात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरेंसारखे नेते असते तर त्यांनी कसल्याही बाबतीत राज्याराज्यांमध्ये असा भेदभाव केला असता का? दुर्दैवाने महाराष्ट्रातील केंद्रीय पातळीवरचे नेते किंवा मोदींचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना काहीही सुचवू किंवा सुनावू शकत नाहीत.


देशपातळीवर लोकसंख्येच्या किंवा बाधितांच्या संख्येच्या आधारावर सर्व सोयीसुविधा पुरविणे संयुक्तिक नाही का? असो. महाराष्ट्राची लोकसंख्या, परप्रांतीय कामगारांचे लोंढे आणि एकूण बाधितांची संख्या या पार्श्वभूमीवर असणाऱ्या किंवा मिळणाऱ्या साधन सुविधांचा सुयोग्य वापर करून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारपेक्षा उत्तमरित्या परिस्थिती हाताळल्याचे स्पष्ट दिसत येत आहे. जिज्ञासूंनी त्याबाबतची आकडेवारी आंतरजालावर तपासून घ्यावी.


आपले महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी, विचारी, समाजाभिमुख लोकांचे, थोर संतपरंपरा लाभलेले राज्य आहे. अशा वैभवसंपन्न राज्यात राजकारणामुळे म्हणा की काही नेत्यांच्या स्वार्थी सत्तालोलुप वृत्तीमुळे म्हणा बऱ्याच उलथापालथी झाल्यात आणि कधी नव्हे ते तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले.


'तीन तिघाडा काम बिघाडा' या म्हणीवर मात करीत उद्धव ठाकरे सर्वांना सोबत घेऊन सरकार चालवीत असताना कोरोना संकट उद्भवले आणि त्यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली. केंद्राची सापत्न वागणूक, विरोधी पक्षाचा जवळजवळ असहकार आणि माजी मुख्यमंत्र्यांचे आकांडतांडव यांच्याकडे दुर्लक्ष करीत ठाकरेंनी डॉक्टर,पोलिस,सरकारी-निमसरकारी कर्मचारी, इत्यादी लोकांच्या सहकार्याने बिकट परिस्थितीचा सामना केला. त्यांनी ज्या पद्धतीने सरकार चालवले ते बघता प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मोदींनी ठाकरेंचा आदर्श घ्यावा असे सुचवले. मुद्दा असा की देशभरातील तमाम नेत्यांमध्ये गुहांना आपल्या महाराष्ट्रातील नेत्याचेच नाव घ्यावेसे वाटावे... हा महाराष्ट्राचा महिमा आहे.


१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते,


"आजच्या ह्या ऐतिहासिक क्षणी पंडित जवाहरलालजीचे आभार मानण्यासाठी मी उभा राहिलो आहे. अनंत काळपर्यंत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्याला पहिला आशीर्वाद देण्याकरता भारताचा आजचा युगपुरुष येथे आला आणि त्याने आम्हाला आशीर्वाद दिले. महाराष्ट्राच्या लाख लाख जनतेतर्फे मी जवाहरलालजींचे लाख लाख आभार मानतो. महाराष्ट्रातील आम्हा माणसांचे त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर भक्ति आहे. आणि आम्ही आज त्यांना परत आश्वासन देऊ इच्छितो की, महाराष्ट्राचे हे जे राज्य निर्माण झाले आहे. ते मराठी जनतेच्या कल्याणाचे काम तर करीलच, परंतु मराठी भाषिकांच्या जवळ जे देण्यासारखे आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले आहे, जे उदात्त आहे, त्याचा त्याग जर करावयाचा असेल तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करू. कारण आमचा हा पहिल्यापासून विश्वास आहे की, भारत राहिला तर महाराष्ट्र राहील, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल.


भारताचे आणि महाराष्ट्राचे हित जेव्हा एकरूप होते तेव्हा भारतही मोठा होतो आणि महाराष्ट्रही मोठा होतो, हा इतिहास महाराष्ट्राच्या रक्तारक्तांतून भिनलेला आहे. आणि म्हणून मी गेल्या चार-आठ दिवसांमध्ये प्रतीकाच्या रूपाने सांगत आलो आहे की, भारताचे प्रतीक हिमालय आहे तर महाराष्ट्राचे प्रतीक सह्याद्री आहे. उंचउंच शिखरे असलेला बर्फाच्छादित हिमालय हे भारताचे प्रतीक आहे, तर दोनशे-दोनशे, तीनशे-तीनशे इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावर घेणारा काळ्या फत्तराचा सह्याद्री आमचे प्रतीक आहे. आणि जर कधी भारताच्या हिमालयावर संकट आलेच तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरता महाराष्ट्राचा सह्याद्री उभी करील, असे मी आपणाला आश्वासन देऊ इच्छितो."


यशवंतरावांचे वरील विचार बघितले तर महाराष्ट्र हा कायम देशाच्या भल्यासाठीच झटेल असे आश्वासनच त्यांनी दिले आहे आणि नंतरच्या अनेक नेत्यांनीही ते निभावले. गेल्या काही वर्षांपासून मोदींच्या एककल्ली आणि स्वकेंद्री राजकारणामुळे भारताचा सांघिक ढाचा ठिसूळ करण्याचे काम सुरू आहे आणि त्याला आपल्या महाराष्ट्राचे काही नेते साथही देत आहेत. पण महाराष्ट्र यातूनही सावरेल, बाहेर निघेल.


महाराष्ट्राचे देशाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत योगदान बघितल्यास 'महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगेल' अशी परिस्थिती आहे. तेव्हा आपला महाराष्ट्र सर्व बिकट प्रसंगांना सामोरे जात कारस्थानी नेत्यांचा बंदोबस्त करीत मार्ग काढेल आणि राष्ट्रालाही योग्य मार्ग दाखवेल तसेच यशवंतरावांनी राष्ट्राला आश्वासन पूर्ण करेल अशी आजच्या महाराष्ट्रदिनी अपेक्षा करायला हरकत नाही. महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!!!!


अॅड. अतुल सोनक,


जय महाराष्ट्र