Sunday, February 27, 2022

आजाद थे, आजाद हैं, और आजाद ही रहेंगे !!












Freedom fighter Chander Sekhar Azad whose death anniversary falls today, He was shot on27th February 1931 in alffred park Allahabad.



 

गावकरी



गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?
नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?
नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?
नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

गावकरी(फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय! विमानतळमध्ये गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय?
नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ! दादाला सांग दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्याबाबांना विचार घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ. मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे.'
लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया.

Saturday, February 26, 2022



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक सभा सुरु होती तिथे गाडगे महाराज पोहचले…
अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले वर केलेल्या दोन्ही हातात हार घेऊन व्यासपीठा समोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले.... "बाबा तुम्ही खाली का उभे? वर या ना."
गाडगे बाबा म्हणाले "नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या." हे ऐकून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन" ह्याच्यावरती गाडगेबाबांचे उत्तर होते "नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या." बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते.
बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले. "बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..? त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले." बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.'' गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.
"आता तुमचे चालू द्या." असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर... गाडगे महाराजांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य... स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे. तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे.
लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा. पण बाबासाहेब मात्र, खालीच बसायचे. ‘जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही. ''स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही. परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या 14 दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील? याची जाणीव यातून होते.
संत गाडगे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला गाडगे महाराजांनी पंढरपूर येथील धर्मशाळा उपलब्ध करुन दिली होती. स्वत: एकही दिवस शाळेत न जाणाऱ्या संत गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्व समजले होते. आजही गाडगे महाराजांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरणारे आहेत.
- #अमर_रामचंद्र_गोडसे

अध्यात्मिकांची बुवाबाजी (मनोगते)


साधारणपणे स्वामी समर्थ, गुळवणी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज, टेंबे स्वामी, गजानन महाराज, पिठले महाराज, शिर्डीचे साईबाबा, यांच्या ठोस जन्म तारखेविषयी कोणी भक्तगँग सांगू शकेल काय?
ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी या संतांच्या जन्म तारखा, ग्रंथ, त्यांचे साहित्य, त्यांचे प्रबोधन कार्य याचे पुरावे उपलब्ध आहेत. महावीर, गौतम बुद्ध, शंकराचार्य, मोहम्मद पैगंबर, गुरू नानक, येशू ख्रिस्त यांचे पण जन्मदिवस, ग्रंथ, त्यांचे कार्य त्यांच्या कार्याचा चिकित्सक अभ्यास उपलब्ध आहे.
तुकारामांचे आडनाव अंबिले होते. देहू येथील ते सावकार होते, वगैरे व्यवहारिक माहिती आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला, याचे दाखले आहेत.
पण...
या तथाकथित महाराज, स्वामींनी काय केले? स्वामी समर्थ यांच्याविषयी पोथी व्यतिरिक्त कोणताही पूरावा नाही. स्वामी समर्थांचे मूळ नाव, आई वडिल असा कोणताही उल्लेख कुठेही
नाही. ते करदळीवनात प्रगटले म्हणे! ही गोष्ट पूर्णपणे अनैसर्गिक म्हणून धादांत खोटी आहे. स्वामी समर्थांचा कालखंड साधारण १८६० ते १९३० असा काहीसा असावा, कारण पोथीमधे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांना एकदाच भेटल्याचा उल्लेख आहे. स्वामी समर्थांचे कार्य काय हा समाजशास्त्रीय प्रश्न आहेच. त्यांनी एक जागा/भूखंड पिशाच्च मुक्त केला. मुळात अतिंद्रिय शक्ती, मेल्यानंतरचा आत्मा वगैरे काही अस्तित्वातच नसते. त्यामुळे जागा पिशाच्चमुक्त केली, हे थोतांड आहे. क्षणभर सत्य मानले तरी प्रश्न येतो की, जागा पिशाच्च मुक्त केली; तर देश इंग्रजमुक्त का केला नाही? इंग्रज ही माणसे होती, म्हणजे पिशाच्चापेक्षा कमी शक्तिशाली.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांना भेटायला गेले हे पण काल्पनिक वाटते. कारण फडके भेटायला गेल्याचा उल्लेख फक्त पोथीत आहे. तो काही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणता येत नाही. तरीपण मान्य करु की, फडके स्वामी समर्थांना भेटले, आणि फडके म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी फडक्यांनी लढायचे ठरवले आहे. त्यावर स्वामींनी त्यांना आत्ता लढून उपयोग नाही, स्वातंत्र्याची वेळ आली नाही, असे सांगितले म्हणे! हेही त्या पोथीत आहे.
आता प्रश्न येतो की,
१) जर वेळ आल्यावर लढायचे म्हणजे १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले, मग १९४६ पासून लढायला पाहिजे होते का?
२) वेळ आल्यावर स्वातंत्र्य मिळेल, मग लढायचे तरी कशाला?
हाच प्रश्न पिठले महाराज, गुळवणी महाराज, काड सिद्धेश्वर महाराज यांच्याबाबत येतो. या बाबा लोकांनी म्हणे कुंडलिनी जागृत केली! मुळात आधुनिक वैद्यक शास्त्रात कुंडलिनी वगैरे काही अस्तित्वात नसतेच. शरीर रचनाशास्त्र यात अंत्य नाडी, कुंडलिनी याचा उल्लेख नाही. तरीपण मान्य करु की, कुंडलिनी जागृत केली. पण उपयोग काय? जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात हे भरीव कार्य झाले, ज्यामुळे मानवी समाज प्रगतीच्या पुढच्या टप्पयावर गेला...?

अजब-गजब जन्मकथा.




विभांडक ॠषी आणि हरीणी यांच्या मिलनातून शृंग ॠषी जन्माला आला.
नदीवर स्नान करणाऱ्या अप्सरेला पाहून भारद्वाजॠषीचा विर्यपात झाला. ते विर्य द्रोणात साठविल्यावर त्यातून द्रोणाचार्य जन्मला.
हनुमानचा घाम मगरीने गिळला, तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. मुळात अंडे देणाऱ्या मगरीने मूल कसे जन्माला घातले?
अल्पवयीन मत्सगंधेवर पराशर ऋषीने बलात्कार केल्यामुळे त्यातून व्यास ऋषी जन्माला आला.
अप्सरेला पाहून सरदवान ऋषीचा गवतावर विर्यपात झाला. त्या विर्यापासून कृपाचार्य जन्माला आला.
अप्सरेला पाहून वरुण व मित्र यांचे विर्यपात झाले. त्या दोघांचे विर्य एका भांड्यात साठविल्यावर त्यातून अगस्ती ऋषी व वशिष्ठ ऋषी जन्माला आले.
असे होते शीघ्रपतन होणारे वासनांध ऋषी!
या जन्मकथा वाचल्यावर पुराणे म्हणजे चांदोबातील बालबुद्धी टाईप भाकड कथांची भारताड पिवळी पुस्तके आहेत, हेच सिद्ध होते.


जेट जगदीश

आजच्या सावरकर पुण्यतिथी निमित्त, त्यांचे मौलिक विचार






१) "गाय माणसाची माता कशी असू शकेल? ती बैलाची माता आहे"
२) युरोपियन लोकांची संस्कृती अप-टू-देट,अद्ययावती तर आमची श्रुती-स्मृती पुरोणोक्त म्हणजे जुनी पुराणी"
३) एकेकाळी मागासलेला युरोप, त्याने त्यांचे बायबल मिटताच हजार वर्षाने आमच्या पुढे गेला"
४) "धर्मबळाची नांगी ठेचिल असे एकच बळ आहे ते म्हणजे
विज्ञानबळ"
५) "यज्ञाने-अग्निपूजेने कोणतेही भौतिक हित साधत नाही"
६)"मागासलेल्या धर्मग्रंथांस त्रिकालाबाधित मानल्याने आम्ही त्यांच्या इतकेच मागासलेले राहिलो"
७)"बोरूच्या लेखणीपलिकडे पाच हजार वर्षात आम्ही दुसरे लेखनसाधन कल्पू शकलो नाही"
८)"काल काय झाले ते सांगण्याचा अधिकार धर्मग्रंथाचा असू शकेल पण आज काय योग्य आहे ते सांगण्याचा अधिकार,प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्ष्म विज्ञानाचा"
९) "आमच्या देशाने सहस्रवर्षं यज्ञातुन व अग्निहोत्रातून खंडोगणती तूप जाळले त्या देशात सतत महामारी,रोगराई, पण पळीभरही तूप असल्या आगीत न जाळणारे यूरोप-अमेरिकादि देश मात्र आयुर्मान"
१०)"ग्रंथ जेवढा प्राचीन,जुना तेवढे त्याच्यातील ज्ञान कालबाह्य झाल्याचा धोका मोठा असतो"
११)" गोपूजा काय किंवा पंचगव्य काय यांची भलावण करणे म्हणजे निव्वळ भाकडपणा आहे"
१२)"सारे नवग्रह मठ्ठ, त्यांना शतकानुशतके प्रार्थना-उपासना करून आम्ही काय मिळवले?"
१३) " गोमांस विषयक हिंदूंची पोथीनिष्ठता जितकी राष्ट्रास घातक तितकीच मुसलमानांची वराहमांस विषयक पोथीनिष्ठता राष्ट्रास घातकच आहे"
१४) "सजातीय विवाहतून झालेल्या संततीपेक्षा विजातीय विवाहातून झालेली संतती अनेकदा श्रेष्ठ ठरली आहे"
【संदर्भ : विज्ञाननिष्ठ निबंध】
स्वत:ला हिंदूत्ववादी व सावरकर-भक्त म्हणवणाऱ्यांना सावरकरांचे हे विज्ञाननिष्ठ विचार मात्र सोयिस्कर रित्या पचनी पडत नाही. तिथे मग त्यांच्या चरितार्थावर प्रश्नचिन्ह लागतो ना !
त्यांचा एकच घोषा असतो- सावरकर हे प्रखर देशभक्त व स्वातंत्र्यवीर होते. स्वतःच स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर कितपत देशभक्त होते, हे त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांवरून स्पष्ट होते. इतर क्रांतिकारकांना "मारता मारता मरेस्तो (ब्रिटिशांशी) झुंजेन" अशी शपथ देणारे सावरकर हे मात्र जेंव्हा पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेंव्हा त्यांचे हातपाय गळाठले व अंदमानात भरती होताच दोन महिन्यांत त्यांनी पहिले माफीपत्र दिले व नंतर अनेक माफीपत्रे ते ब्रिटिशांना लिहित गेले. त्यावर मखलाशी अशी की पन्नास वर्षं तुरुंगात सडून आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा तुरुंगातून बाहेर सुटून आल्यास भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी भरीव कामगिरी करून आयुष्य सत्कारणी तरी लावता येईल. दोन काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या खतरनाक (?) सावरकरांना दहा वर्षांतच ब्रिटिशांनी अंदमानातून मुक्त का केले, याचे पटण्याजोगे स्पष्टीकरण मात्र सावरकर-भक्त देत नाही. त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी मग ते सावरकरांना गांधीजींच्या( व नेहरुंच्या) तुलनेत किती जास्त दिवस तुरुंगात ठेवले, याचा तक्ता देऊन, ब्रिटिशांच्या गांधीजींना किती लाठ्या खाव्या लागल्या, यांचा वायफळ हिशोब मांडून, त्यावरून त्यांचे देशासाठीच्या योगदानाचे मोल ठसवू पहातात.
सावरकरांनी इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून (व आपण नामानिराळे राहण्याचा चतुरपणा दाखवत) हिंसेचा मार्ग अवलंबला होता तर गांधीजींनी कधीच शस्त्र हाती न घेता सविनय कायदेभंग व ब्रिटिशांविरोधात जनजागरणाचे काम केले होते. गुन्ह्याच्या प्रमाणात इतकी तफावत असतांना दोघांनाही समान शिक्षा कशी होऊ शकेल, हा साधा विचारही सावरकरभक्तीमुळे विवेक हरवलेल्यांना व तरीही स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्यांना कसा शिवत नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. बरे, ज्या हेतूने अंदमानातून सुटका करवून घेतल्याचा दावा केला गेला तर ते इप्सित साधण्यासाठी अंदमानोत्तर काळात ब्रिटिश विरोधी एखादे तरी कृत्य त्यांनी केले होते काय, तर याबाबतीत नन्नाचाच पाढा ! उलट भारतीय संघराज्यात सामिल होऊ नये म्हणून भारतातल्या विविध संस्थानिकांना फूस लावण्याचे काम करूनही त्यांनी, आपली विवेकबुद्धी हरवलेल्या भक्तांच्या मनात, आपली स्वतःची फाळणी विरोधी व अखंड भारतवादी अशी प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यश मिळवल्याचे दिसते. सावरकरांना ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम चार महिन्यांचा कारावास का भोगावा लागला होता व त्यांची कथित पहिली पत्नी कासाबाई ही निराशाग्रस्त होत शंकरलाल कनौजिया यांचे बरोबर का पळून गेली, हे साधे प्रश्नही त्यांच्या भक्तांना पडत नाही. मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश ऑफिसर वायली याचा खून करण्याची "प्रेरणा" त्यांनीच दिली की जे काम ते स्वतःही करू शकले असते. पण ते शेवटपर्यंत प्रेरणेचे पुरवठादार च्या भूमिकेतच वावरले. वायलीहत्येची कामगिरी फत्ते झाल्यानंतर त्यांनी त्या हत्येची जबाबदारी शिताफीने झटकली. धिंग्राने लंडनमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावरून चिडून जाऊन सावरकरांना त्याने "भ्याड" म्हणून संबोधले होते. सावरकरांनी दिलेल्या प्रेरणेतून ज्या घटनांना अंजाम मिळाला त्यापैकी एकाही घटनेची जबाबदारी त्यांनी घेतली नाही. ज्यांनी त्या प्रेरणा कृतित उतरवल्या त्या धिंग्रा/कान्हेरे/पिंगळे/गोडसे हे फासावर चढले पण सावरकर मात्र प्रत्येकवेळी चतुराईने सही सलामत सुटत ८३ वर्षांचे पूर्ण आयुष्य जगले. सावरकरांनी दयाही ब्रिटिशांकडे या कृत्यांसाठी मागितली की ज्या कृत्यांसाठी धिंग्रा/अनंत कान्हेरे हे फासावर गेले. धिंग्रा/कान्हेरे/पिंगळे/गोडसे यांना फाशीच्या तख्तावर नेणाऱ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी तात्यांनी टाळल्याचे दिसते. "१८५७ : भारताचे स्वातंत्र्यसमर" हे पुस्तक लिहून १८५७ च्या घटनांचे प्रथमच गौरवीकरण केल्याचे श्रेय त्यांनी घेतले पण कार्ल मार्क्स यांनी १८८३ या सावरकरांच्या जन्मसालाआधीच याच शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते, ही गोष्ट चतुराईने लपवली गेली. म्हणजेच कॉंग्रेसच्याच वल्लभभाई पटेल/सुभाषबाबू/भगतसिंग (हो, भगतसिंग हेदेखील सुरुवातीस कॉंग्रेसचेच सदस्य होते व नंतर ते डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले.) वगैरे लोकोत्तर पुरुषांचा वारसा लाटण्याचा लुच्चेपणा जसा वर्तमान भाजपा शासन करते तसाच काहीसा लुच्चेपणाचा पायंडा हा त्यांना(च) वंदनीय नेत्याने आधीच घालून दिला होता तर ! तोवर भारताच्या स्वातंत्र्य समरात मुसलमानांचा ही खूप वाटा होता, असा गौरवास्पद उल्लेख करणाऱ्या तात्यांनी मुस्लिमांचा द्वेष करण्याचे १८०° तफावतीचे धोरण अंदमानोत्तर का अवलंबले व केवळ भारत हा हिंदूंचाच, असे का प्रतिपादन केले, हे कोडेच होते. बरं, त्याच मुस्लिमांच्या लीग सोबत भारतातील चार प्रांतात ते सत्तेत भागीदारी करून होते. किती विरोधाभास ! त्यांनी म्हणे सशस्त्र क्रांतीदल उभारले होते. पण स्वातंत्र्यापूर्वी नौखालीत मुस्लिमांनी जेंव्हा हिंदूंचे हत्याकांड चालविले होते तेंव्हा, जिथे सावरकरांची हिंदू महासभा मुस्लिम लीग सोबत सत्तेत सहभागी होते तिथे, ते क्रांतिदल हिंदूंच्या रक्षणार्थ का धावून गेले नाहीत? काय आचमने घेत बसले होते? तेथे हिंदूंच्या मदतीसाठी एकच जण निधडेपणाने केवळ पंचानिशी धावला ज्यांचा सावरकरांनी सातत्याने द्वेषच केला. सावरकरांची अंदमानातून सुटका करावी, यासाठी ह्याच महात्म्याने सुचवले होते, अशी लोणकढी थाप राजनाथसिंह यांनी "ठोकून देतो ऐसाजे" स्वरूपात मारली. इतिहासाची विकृत स्वरूपात मांडणी करणे, हा तर हिंदूत्ववाद्यांचा हातखंडा खेळ. सावरकरांनी जर गांधीजींनी सुचवल्यावरूनच माफी मागितली (अन्यथा ते संपूर्ण पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यास तत्परच होते जणू !) हे जर खरे होते तर आपणाविषयी सद्भाव बाळगणाऱ्याच्या हत्येचे प्रयत्न करणारे ते कृतघ्न देखील होते, हे सिद्ध होते. म्हणजेच ते केवळ माफीवीरच नाही तर कृतघ्न ही होते, हेही आपसूकच सिद्ध होते. असो, आम्हास हे ठाऊक आहे की कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच !
हे म्हणे सुभाषचंद्र यांचेही गुरू होते व त्यांनी सावरकरांकडूनच ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली, अशी लोणकढी हे सावरकर भक्त ठोकून देतात. १९३९ मध्ये सुभाषचंद्र यांनी सावरकरांची भेट घेऊन त्यांनी द्विराष्ट्रवादाला सोडचिठ्ठी द्यावी, असा आग्रह धरला. पण त्यांना निराशेने परतावे लागले. बोसांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात उद्विग्नतेने लिहिले, "हा माणूस (म्हणजे तात्या) अस्मितेच्या खोट्या कल्पनांनी व न्यूनगंडांनी इतका पछाडलाय की हा देशाचं विभाजन पत्करेल पण देशाच्या एकात्मतेसाठी काही करणार नाही !" त्या उद्विग्नतेतूनच सुभाषबाबूंनी त्या दिवशीची प्रस्तावित सभा रद्द केली. सावरकर हे सुभाषबाबूंचे गुरू असते तर आझाद हिंद फौजेत अनेक वरिष्ठ पदांवर मुस्लिम अधिकारी दिसलेच नसते. ब्रिटिशांनी १९२४ सालीच सावरकर हे रत्नागिरी येथे पत्नीसह वास्तव्य करतांना त्यांना पेन्शन देऊ केले. ते का, हा साधा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडत नाही. एका काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्यांवर कुठलीही दयामाया ब्रिटिश दाखवत नव्हते, अनेकजण ठार वेडे होईपर्यंत शिक्षा भोगत होते आणि ह्या दोन काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या आणि स्वतःलाच स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणाऱ्यावर ब्रिटिश मेहेरबान होत मासिक पेन्शन देऊ लागले ! Wonderful !!
दया, कुछ तो भी गडबड है. कहीं देश विभाजन करके स्वतंत्रता आंदोलन को ब्रेक लगाने की सुपारी तो ब्रिटिशों से इसने नहीं ली थीं ? वरना, पचास साल की कालापानी की सज़ा जिसपर थोपी गई थीं उसपर ब्रिटिश सल्तनत इतनी मेहरबान क्यों होती?

Stop limiting yourself and what you can achieve right now.


 

Friday, February 25, 2022

M A Jinnah with his close industrialist friend Ram Kishan Dalmia. Jinnah sold his bunglow 10 - Aurangzeb Road New Delhi to him, he got the bunglow washed with ganga jal ! He had 17 children from 6 wives.Dalmia was the name of his his ancestral village in Haryana.

He was the owner of a big textile industry named Sutlej Textile Mills in Okara which he owned till 1965, He used to visit it quite frequently till then. It was nationalized as enemy property during the 1965 war and was unfortunately destroyed within 10-12 years. It was a huge unit that employed around 6000 workers and was a model industry that looked after its employees very generously.




संत गाडगेबाबा





संत गाडगेबाबा – बालपण 

 गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले.त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा.
ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.
संत गाडगेबाबा – गाडगे महाराज

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी परिट होते.

संत गाडगेबाबा विषयी


अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे.

संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली.



महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत- ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला.

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे.

आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन धर्ममरतडांकडून हेटाळणी व अपमान सहन केले. भोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे संत गाडगेबाबा ही एक बाजू आत्तापर्यंत आपल्या सर्वाना माहीत आहे. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक ‘वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा’ यांची ही अज्ञात बाजू जाणून घेऊ.

हल्लीच्या युगात, गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी, विशेषकरून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते




संत गाडगेबाबा – कार्य

१९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.

१९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.

१९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘

१९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली. गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.



गाडगे महाराज यांची एक सुंदर कविता

‘काय करून ऱ्हायला रे ?’
‘न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’
‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’
‘देवाचच लेकरू हाय !’
‘आन तूह लेकरू ?’
‘माह व्ह्य ना जी !’
‘आन तू कोनाचा रे ?’
‘मी माह्या बापाचा न जी !’
‘म्हन्जे शेवटी कोनाचा ?
‘देवाचं लेकरू !’
‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
‘हो जी !’

अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.

पुरस्कार

गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

मृत्यू


२० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

Be kind.

Sunday, February 20, 2022

हम आजाद हैं...


भारत में सेवा करने वाले ब्रिटिश अधिकारियों को इंग्लैंड लौटने पर सार्वजनिक पद/जिम्मेदारी नहीं दी जाती थी। तर्क यह था कि उन्होंने एक गुलाम राष्ट्र पर शासन किया है जिस जी वजह से उनके दृष्टिकोण और व्यवहार में फर्क आ गया होगा। अगर उनको यहां ऐसी जिम्मेदारी दी जाए, तो वह आजाद ब्रिटिश नागरिकों के साथ भी उसी तरह से ही व्यवहार करेंगे।
इस बात को समझने के लिए नीचे दिया गया वाक्य जरूर पढ़ें
एक ब्रिटिश महिला जिसका पति ब्रिटिश शासन के दौरान पाकिस्तान और भारत में एक सिविल सेवा अधिकारी था। महिला ने अपने जीवन के कई साल भारत के विभिन्न हिस्सों में बिताए। अपनी वापसी पर उन्होंने अपने संस्मरणों पर आधारित एक सुंदर पुस्तक लिखी।
महिला ने लिखा कि जब मेरे पति एक जिले के डिप्टी कमिश्नर थे तो मेरा बेटा करीब चार साल का था और मेरी बेटी एक साल की थी। डिप्टी कलेक्टर को मिलने वाली कई एकड़ में बनी एक हवेली में रहते थे। सैकड़ों लोग डीसी के घर और परिवार की सेवा में लगे रहते थे। हर दिन पार्टियां होती थीं, जिले के बड़े जमींदार हमें अपने शिकार कार्यक्रमों में आमंत्रित करने में गर्व महसूस करते थे, और हम जिसके पास जाते थे, वह इसे सम्मान मानता था। हमारी शान और शौकत ऐसी थी कि ब्रिटेन में महारानी और शाही परिवार भी मुश्किल से मिलती होगी।
ट्रेन यात्रा के दौरान डिप्टी कमिश्नर के परिवार के लिए नवाबी ठाट से लैस एक आलीशान कंपार्टमेंट आरक्षित किया जाता था। जब हम ट्रेन में चढ़ते तो सफेद कपड़े वाला ड्राइवर दोनों हाथ बांधकर हमारे सामने खड़ा हो जाता। और यात्रा शुरू करने की अनुमति मांगता। अनुमति मिलने के बाद ही ट्रेन चलने लगती।
एक बार जब हम यात्रा के लिए ट्रेन में सवार हुए, तो परंपरा के अनुसार, ड्राइवर आया और अनुमति मांगी। इससे पहले कि मैं कुछ बोल पाती, मेरे बेटे का किसी कारण से मूड खराब था। उसने ड्राइवर को गाड़ी न चलाने को कहा। ड्राइवर ने हुक्म बजा लाते हुए हुए कहा, जो हुक्म छोटे सरकार। कुछ देर बाद स्टेशन मास्टर समेत पूरा स्टाफ इकट्ठा हो गया और मेरे चार साल के बेटे से भीख मांगने लगा, लेकिन उसने ट्रेन को चलाने से मना कर दिया. आखिरकार, बड़ी मुश्किल से, मैंने अपने बेटे को कई चॉकलेट के वादे पर ट्रेन चलाने के लिए राजी किया, और यात्रा शुरू हुई।
कुछ महीने बाद, वह महिला अपने दोस्तों और रिश्तेदारों से मिलने यूके लौट आई। वह जहाज से लंदन पहुंचे, उनकी रिहाइश वेल्स में एक काउंटी मेथी जिसके लिए उन्हें ट्रेन से यात्रा करनी थी। वह महिला स्टेशन पर एक बेंच पर अपनी बेटी और बेटे को बैठाकर टिकट लेने चली गई।लंबी कतार के कारण बहुत देर हो चुकी थी, जिससे उस महिला का बेटा बहुत परेशान हो गया था। जब वह ट्रेन में चढ़े तो आलीशान कंपाउंड की जगह फर्स्ट क्लास की सीटें देखकर उस बच्चे को फिर गुस्सा आ गया। ट्रेन ने समय पर यात्रा शुरू की तो वह बच्चा लगातार चीखने-चिल्लाने लगा। "वह ज़ोर से कह रहा था, यह कैसा उल्लू का पट्ठा ड्राइवर है है। उसने हमारी अनुमति के बिना ट्रेन चलाना शुरू कर दी है। मैं पापा को बोल कर इसे जूते लगवा लूंगा।" महिला को बच्चे को यह समझाना मुश्किल हो रहा था कि "यह उसके पिता का जिला नहीं है, यह एक स्वतंत्र देश है। यहां डिप्टी कमिश्नर जैसा तीसरे दर्जे का सरकारी अफसर तो क्या प्रधान मंत्री और राजा को भी यह अख्तियार नहीं है कि वह लोगों को उनके अहंकार को संतुष्ट करने के लिए अपमानित कर सके
आज यह स्पष्ट है कि हमने अंग्रेजों को खदेड़ दिया है। लेकिन हमने गुलामी को अभी तक देश बदर नहीं किया। आज भी कई डिप्टी कमिश्नर, एसपी, मंत्री, सलाहकार और राजनेता अपने अहंकार को संतुष्ट करने के लिए आम लोगों को घंटों सड़कों पर परेशान करते हैं। इस गुलामी से छुटकारा पाने का एक ही तरीका है कि सभी पूर्वाग्रहों और विश्वासों को एक तरफ रख दिया जाए और सभी प्रोटोकॉल लेने वालों का विरोध किया जाए।
नहीं तो 15 अगस्त को झंडा फहराकर और मोमबत्तियां जलाकर लोग खुद को धोखा देते हैं के हम आजाद हैं...
प्रोटोकॉल को ना कहें।

कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेला शिवाजी

 

" माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा गुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो, " नरहर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात काढलेले हे उदगार शिवाजी महाराजांसह अनेक नेत्यांबाबत कमी अधिक प्रमाणात सत्य आहेत. आणि म्हणूनच शिवरायांवर आपण लादलेल्या देवत्वापलिकडे जावून आपणाला त्यांचे कार्य समजावून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता?’ , हे छोटेसे पुस्तिकावजा पुस्तक महत्वाचे आहे. पुस्तकाच्या नावापासूनच पानसरे यांची मांडणी सुरु होते. ‘ शिवाजी कोण होता?’ असा शिवाजीचा एकेरी उल्लेख पानसरे करतात तेव्हा ते शिवाजीचा अनादर करत नाहीत तर शिवाजीला माणसाच्या पातळीवर आणून त्याच्याभोवती असलेले देवत्व आणि अवताराचे अनाठायी वलय सहजी भेदतात. असा शिवाजी आपला असतो, अगदी जवळचा असतो.
भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे. लोकशाही ही राजकीय प्रणाली आपण अंगिकारिली आहे. आणि असं असतानाही आजच्या या लोकशाही समाजात वावरतानाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल प्रचंड आदर आहे. आजच्या आधुनिक समाजाच्या आदर्शांपैकी ते एक आहेत. खरं म्हणजे, शिवाजी महाराज हे राजे होते. ते काही आजच्या सारखे लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख नव्हते. राजेशाही ही व्यवस्था म्हणून आपण नाकारली आहे पण शिवराय मात्र आजही आपणां सर्वांना परमप्रिय आहेत. सुमारे साडे तीनशे वर्षांपूवी जन्मलेल्या शिवरायांचे गारुड आजच्या लोकशाही व्यवस्थेत वावरतानाही आपल्या मनावर का आहे ? कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि महत्वाचे म्हणजे खरा शिवाजी कळत जातो. महाराजांमधील नक्की कोणत्या गुणवैशिष्ट्यांना आपण अंगिकारले पाहिजे, याची जाणीवही हे छोटेखानी पुस्तक करुन देते.
खरं म्हणजे तीन चारशे वर्षांपूर्वीच्या राजेशाही – सरंजामशाही व्यवस्थेत राजे येत असत आणि जात असत, सर्वसामान्यांच्या जगण्यात काही फरक पडत नसे. हे सांगताना पानसरे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘ महिकावतीची बखर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे म्हटले आहे ते उध्दृत केले आहे , ‘ गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी काही देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सारी पोटभरु चोरांची झाली. आणि सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी अशी गावक-यांची अंतःस्थ प्रामाणिक समजूत असे.’ याच स्वरुपाचा कार्ल मार्क्सचाही दाखला पानसरे देतात. असे असताना शिवाजी बाबत मात्र वेगळे कसे घडले ? या राजासाठी खेड्यापाड्यातील लोक जीव द्यायला देखील तयार होते. शिवरायांचे वेगळेपण नेमके कशात होते ?
आजच्या लोकशाहीच्या थांब्यावरुन शिवाजी महाराजांकडे विश्लेषक दृष्टीने पाहताना त्यांच्या रुपाने आपल्या वारशाचा मथितार्थ आपल्याला कळू शकेल. अर्थात तो नेमक्यापणे कळण्यासाठी रुढ इतिहासाने, धूर्त इतिहासकारांनी देऊ केलेले चष्मे आपण नाकारले पाहिजेत, आणि आपल्या स्वतःच्या निखळ नजरेने काळाच्या या बुरुजावर उभे राहून शिवाजी नावाच्या भूतकाळाकडे नव्याने पाहिले पाहिजे.
शिवाजी महाराजांचे वेगळेपण -
शिवाजी राजांचे वेगळेपण हे की त्यांनी आयत्या पीठावर रेघोटया मारल्या नाहीत. स्वराज्य त्यांनी स्वतः स्थापन केले. स्वतःच्या आणि आपल्या जीवाला जीव देणा-या मित्रांच्या, सहका-यांच्या मदतीने ते वाढविले, राखले. आजच्या युगात शिवाजी समजून घेताना घराणे आणि कुळाच्या मोठेपणात अडकलेल्या सगळ्यांनी शिवाजी नावाच्या माणसाचे हे वेगळेपण समजावून घेतले पाहिजे.
" कुळ माझे मोठे,जात माझी मोठी
बढाई असली,नको मारु खोटी
तुझे कर्म तुझा,ठरविते भाव
जात कुळगोत्र,नको आणू आव
तथागत म्हणे,समान सगळे
श्रेष्ठ कनिष्ठ ना,कुणी ना वेगळे
कर्म तुझे सांगे,तुझे खरे मोल
कुळ,गोत्र,जात,वल्गना या फोल " ( धम्मधारा - प्रदीप आवटे)
तथागत गौतम बुध्दाच्या विचारांचे मूर्तिमंत प्रतिबिंब आपल्याला शिवाजी राजांच्या चरित्रात दिसून येते. शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना पारंपारिक सरंजामशाही व्यवस्थेला प्रखर विरोध करण्याची हिंमत म्हणून तर असायला हवी. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केले हे जसे त्यांचे वेगळेपण आहे तसेच हे राज्य स्थापन करण्यामागील त्यांचा हेतूही केवळ स्वतःची महत्वाकांक्षा तडीस नेण्याचा नव्हता. स्वराज्य स्थापनेमागील त्यांचा हेतू लोककल्याणकारी होता. त्याकाळीच्या इतर राजांप्रमाणे केवळ स्वतःच्या तुंबडया भरणे, त्यांच्या गावीही नव्हते.
शिवाजी - रयतेचा राजा
शिवाजी महाराज हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील खरेखुरे रयतेचे राजे होते. त्यांच्यापूर्वी अनेक राजे आले गेले तरी लोकांचे जे प्रेम महाराजांना मिळाले ते इतरांना मिळाले नाही, याचे कारण शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या पध्दतीत होते. त्या काळी गावोगावी कुलकर्णी, देशमुख, देसाई, पाटील , खोत, मिरासदार, देशपांडे असे वतनदार लोक होते. राजा कुणीही असला तरी गावोगावी खरे राज्य असे ते या वतनदारांचे ! शेतक-यांकडून हवा तसा अगदी दहा दहा पट सारा वसूल करणे, तो सरकारातही जमा न करता ऐषोराम करणे, हे वतनदार वर्गाचे सर्वसाधारण चारित्र्य होते.
या अन्याय्य सामाजिक सांगाडयाला हात घालण्याचे धाडस राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांनी दाखवले. त्यांनी शेतजमीनीचे यथायोग्य डॉक्युमेंटेशन केले. प्रत्यक्ष उभ्या पिकावरुन सारा ठरे. सारा आकारणीची निश्चित पध्दत होती. शेतकरी सारा धान्यरुपात किंवा नगद स्वरुपात भरु शकत असे. दुष्काळात शेतक-याला तगाई मिळे. ती फेडण्यासाठी चार पाच वर्षांची मुदत असे. शिवाजी राजांनी वतनदार पध्दतीचे कंबरडेच मोडले. त्यांनी सारा वसुली करता वेगळे अधिकारी नेमले. या सुधारणांमुळे रयत सुखावली नसेल तर नवल. रयतेच्या गवताच्या काडीची सुध्दा काळजी घेणारा असा राजा जनतेच्या गळ्यातील ताईत होईल, यात काय नवल ! आज आधुनिक व्यवस्थेत देखील लोकशाहीच्या आधारे अशी नवी सरंजामशाही, नवे वतनदार फोफावताना, दृढ होताना आपण पाहतो तेव्हा महाराजांनी साडेतीन शतकांपूर्वी केलेल्या कामाचे महत्व आपल्या लक्षात येते. आज पंचायत राज व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न हव्या त्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाहीत. त्या करता प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. शिवाजी महाराजांनी केलेल्या या मूलभूत आर्थिक सुधारणांचे कौतुक श्रीपाद अमृत डांगे सारखे कम्युनिस्ट विचारवंत देखील करतात, ते याचमुळे.
शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन –
गरीब कुणब्याच्या पोरीवर अत्याचार केलेल्या रांझ्याच्या पाटलाला शिवाजी राजांनी कोणती शिक्षा दिली, हे आपण सारेच जाणतो. बेळवाडीचा किल्ला जिंकणा-या आपल्या सेनापतीने सकुजी गायकवाडने विजयाच्या उन्मादात त्या किल्ल्याच्या किल्लेदार असणा-या सावित्री देसाईवर बलात्कार केला, तेव्हा आपल्याच सेनापतीची गय न करता महाराज त्याला आजन्म तुरुंगात डांबतात. कठुआतील आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारे केवळ आपल्या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे कोणत्या तोंडाने महाराजांचा जयजयकार करु शकतात ? ‘बघतोस काय, मुजरा कर,’ म्हणणा-यांना महाराज कळू शकत नाहीत. महाराज म्हणजे गुर्मी आणि अहंकार नव्हे, हे समजायला हवे.
शिवाजी राजांच्या राज्याची भाषा –आपल्या राज्याची भाषा कोणती असावी, याबाबत शिवाजी राजांनी जो विचार केलेला आहे तो त्यांच्या राज्यकारभारविषयक दृष्टीकोनाचा निदर्शक मानता येईल. राज्यकारभारात फारसी भाषेचे वर्चस्व असणा-या काळात शिवाजी महाराज ‘राज्यव्यवहार कोश’ निर्मिती करतात आणि राज्यातील प्रशासकीय व्यवहार प्राकृतात करण्याची पध्दत सुरु करतात. राजा आणि राज्य लोकांच्या भाषेत बोलले पाहिजे, लोकांच्या भाषेत चालले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला लोकांच्या सुख-दुःखाचे भान पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे या सर्व निकषांवर खरे उतरते आणि म्हणूनच ते ख-या अर्थाने रयतेचे राज्य होते.
भारताच्या स्वातंत्र्यावर १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. भाषावार प्रांत रचनेसाठी अनेक संघर्ष झाले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा अगदी काल परवाचा वाटावा एवढा अलिकडला आहे. मराठी आपली राजभाषा झाली पण स्वातंत्र्यपूर्व काळात जी खंत माधव ज्युलियन यांनी व्यक्त केली होती –
‘ मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे’
ती खंत आता त्यांच्याच शब्दांत थोडा बदल करुन सांगावयाचे तर –
‘मराठी असे आमुची राजभाषा
जरी आज ती मायबोली नसे’
अशी विपरित झाली. राज्यनिर्मितीचा अर्धशतकाहून अधिक वाटचालीनंतरही न्यायालये आणि इतर अनेक शासन व्यवहारात मराठी आणण्यात आपल्याला यश मिळाले नाही. आता तर मराठी शाळांचा टक्का घटतो आहे. शिवाजी राजांच्या चरित्राची भाषा विषयक धोरणासंदर्भातील बाजू आजच्या वर्तमानात आपण कसे पाहणार आणि त्यातून काय शिकणार, हा ही कळीचा मुद्दा आहे.शिवाजी राजांचा संघर्ष म्हणजे हिंदू – मुस्लिम संघर्ष ?
उजवे विचारवंत, इतिहासकार शिवाजी राजांना ‘ गोब्राम्हण प्रतिपालक’ म्हणून संबोधतात. त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात आणि त्यांनी एकूणच आयुष्यभर केलेला संघर्ष हिंदू विरुध्द मुस्लिम अशा रंगात रंगविला जातो. तुमचे माझे सर्वांचेच सखोल वाचन हरवलेले असताना आणि वॉटसअप हा आपल्या माहितीचा प्रमुख स्त्रोत असणा-या विलक्षण काळात आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे डोळे उघडून पाहिले पाहिजे आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या हिंदू मुस्लिम द्विध्रुवात्मकतेचा छेद घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी केलेल्या एकूण लढाया आपण पाह्यल्या तर जेवढया लढाया त्यांनी मुस्लिम राजवटींविरुध्द केल्या तेवढाच संघर्ष त्यांना मोरे, मोहिते, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर अशा आपल्याच लोकांविरुध्द करावा लागला. त्या काळी मोगल आणि चारी शाह्या मुसलमान असल्या तरी त्यांच्या पदरी असणारे अनेक सरदार मराठा होते. औरंगजेबाच्या वतीने मिर्झाराजे जयसिंगांसारखा रजपूतच महाराजांवर चालून आला होता. दुसरीकडे आपण शिवाजीच्या सहका-यांची नावे पाहिली तर त्यांना आग्र्याहून हिकमतीने पळून जाण्यात मदत करणारा मदारी मेहतर कोण होता, मुसलमानच ! शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान कोण होता, मुसलमानच ! आरमार दल उभारण्याची दूरदृष्टी दाखवणा-या महाराजांचा आरमार प्रमुख देखील दर्यासारंग दौलतखान हा ही मुसलमानच होता. ही यादी एवढ्यावरच थांबत नाही, ती खूप मोठी आहे आणि ती बोलकी आहे. कॉम्रेड पानसरे यांनी रियासतकार सरदेसाईंचा एक संदर्भ दिला आहे. १६४८ मध्ये शिवाजी राजांच्या सैन्यात सामील होण्याकरता पाचसातशे पठाण आले तेव्हा राजांना गोमाजी नाईक पानसंबळ यांनी एक सल्ला दिला –
‘ तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही, अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे अठरा जाती चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करुन ठेवावे.’आजच्या परिभाषेत बोलायचे तर राज्य ‘सेक्युलर’ असणे का गरजेचे असते, हेच गोमाजी नाईक पानसंबळ जणू समजावून सांगताहेत. ज्याने त्याने आपापले धर्माप्रमाणे चालावे, त्यात राजाने ढवळाढवळ करु नये, भेदभाव करु नये, ही समज महाराजांच्या सामान्यातल्या सामान्य सहका-यालाही होती . ही समज आजच्या काळात हरवत चाललेली असताना शिवाजी राजे निव्वळ आठवणे नव्हे तर अनुसरणे आवश्यक आहे. शिवकालात मुसलमान राजवटी दुस-या स्वधर्मिय राजवटीविरुध्द लढताना दिसतात, हिंदू राजे हिंदू राजांविरुध्द लढताना दिसतात. याचा अर्थ मध्ययुगीन काळातील या संघर्षाकडे हिंदू मुस्लीम या नेहमीच्या भिंगातून पाहण्याचा मूर्खपणा करु नये. या संदर्भात हिंदूवर जिझिया कर बसविला या बद्द्ल शिवाजी राजांनी औरंगजेबाला लिहलेले पत्र मोठे बोलके आणि महाराज धर्माकडे कोणत्या नजरेने पाहत होते, हे स्पष्ट करणारे आहे. या पत्रात महाराज सुरुवातीला औरंगजेबास अकबराची आठवण करुन देतात. त्यांनी सर्व धर्माच्या आपल्या प्रजेला न्यायबुध्दीने वागविले म्हणून तर जनता त्यांना ‘जगदगुरु’ म्हणे, हे सांगतात. आणि पुढे लिहतात , ‘कुराण हे अस्मानी किताब आहे. या पुस्तकात ईश्वराला ‘ जगाचा ईश्वर’ म्हटले आहे, केवळ ‘ मुसलमानांचा ईश्वर’ म्हटलेले नाही. कारण हिंदू मुसलमान या जाती ईश्वरासमोर एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती ईश्वराची स्तुती होय आणि हिंदू लोकही मंदिरात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जातिधर्मावर जुलूम करणे भगवंतांशी वैरत्व करणे होय.’राजाचा धर्म हाच त्याच्या राज्याचा आणि राजकीय संघर्षाचा धर्म नसतो, नव्हे तो नसावा, हे न कळणा-या लोकांनी महाराजांना आणि त्यांच्या संघर्षाला धार्मिक रंगात रंगविण्याचे कारस्थान रचले आहे. हिंदू साधू संतांचा आदर करणारे महाराज याकुत बाबा या मुस्लिम संताचाही आदर सन्मान करत, हे लक्षात घेतले तर भगव्या हिरव्याच्या रंगापलिकडील खुल्या आभाळात विराजमान झालेले शिवाजी महाराज आपल्याला कळू शकतील.
शिवाजी राजांच्या व्यक्तित्वाला काळाच्या मर्यादा नव्हत्या असे नाही. प्रत्येक महापुरुषाच्या व्यक्तित्वाला त्या असतात. राज्याभिषेकासाठी पुरोहितशाहीचे म्हणणे मान्य करणारे महाराज पाहताना काळाच्या अपरिहार्य चौकटीची आपल्याला कल्पना येते. पण त्याच वेळी मुसलमान झालेल्या नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांना महाराज हिंदू धर्मात परत घेतात. केवळ परत घेतात असे नाही तर निंबाळकरांशी स्वतःच्या मुलीचा विवाह लावतात. याचा अर्थ आपण नीट समाजावून घेतला पाहिजे. शिवाजी राजे धार्मिक जरुर होते पण ते धर्मांध नव्हते. औरंगजेब अथवा इतर कोणत्याही मुसलमान राजवटीविरुध्दचे त्यांचे युध्द हे धर्मयुध्द नव्हते. जी गोष्ट धर्माची तीच जातीची . शिवाजी राजे खरं म्हणजे केवळ मराठ्यांचे देखील नव्हते. अठरापगड माणसं त्यांच्या सोबत होती. ब्राम्हणांपासून न्हावी, रामोशी, महार, मांग अशी सगळ्या जातीची माणसं महाराजांसोबत होती, त्यांच्या जीवाभावाची होती. त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख असणारा बहिर्जी नाईक हा रामोशी होता. शिवाजी राजांनी अस्पृश्य मानल्या जाणा-या अनेकांना किल्लेदार आणि त्यांच्या मगदूराप्रमाणे विविध पदावर नेमले होते. शिवाजी राजांच्या धार्मिक आस्थेला खुलेपणाची, मोकळ्या अवकाशाची आस होती. म्हणूनच सामूहिक सर्जकतेचे मूर्तिमंत स्वरुप असणारे राज्य महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी अवतरु शकले. हे स्वराज्य कोण्या एका धर्माची, जातीची मिरासदारी नव्हती. महाराष्ट्रातील प्रबोधन काळात महात्मा फुले शिवाजीची समाधी शोधतात, त्याच्यावर ‘कुळवाडी भूषण’ असा गौरव करत पवाडा रचतात. याच फुल्यांना गुरुस्थानी मानत आंबेडकर आपली सामाजिक चळवळ संविधानापर्यंत नेतात. हा सारा मूल्यात्मक प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. आज शिवाजीचे नाव घेऊन जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे मनोहर, मनाला भिडणारे आणि भेडवणारे प्रकार पाह्यला मिळत असताना शिवाजीचे भीमनगर मोहल्ल्याशी असणारे जैव नाते आपल्याला समजायला हवे. आज शिवाजीच्या नावावर अनेकांनी राजकीय वतनदारी सुरु केली आहे. राजकीय स्वार्थाचा रंग फासत आपल्याला हवा तसा शिवाजी रंगवणा-या या सगळ्यांपासून चार हात दूर राहण्यात शहाणपण आहे. आपल्या डोळ्यांदेखत होणारे आपल्या लाडक्या राजाचे अपहरण आपण समंजसपणे रोखले पाहिजे. शिवाजीचे नाव वापरुन आपल्याला वेगवेगळया अस्मितांमध्ये झुंजवण्याचा खेळ राजकीय शक्ती खेळत आहेत. आणि आपण वेड्यासारखे महाराजांचे स्मारक, तिथल्या पुतळ्याची कमी जास्त होणारी उंची या वादात अडकलो आहोत. शिवाजीला समजावून घेण्याकरता पुतळ्याची नव्हे आपल्याला आपली बौध्दिक उंची वाढविण्याची गरज आहे. खोटया अस्मितांना गोंजारणे आता बंद करु या.कॉ गोविंद पानसरे यांचे ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना रयतेवर प्रेम करणारा, राजधर्म पाळणारा राजा, परंपरागत अन्याय्य राजकीय व्यवस्था मोडून काढणारा बंडखोर, स्त्रीचा कमालीचा आदर करणारा एक सुसंस्कृत माणूस, राजभाषेविषयी विचार करणारा राजकीय धुरिण अशा अनेक रुपात शिवाजी राजे आपल्यासमोर येतात.
शिवरायांची ही इतिहासाशी सुसंगत आणि वस्तुनिष्ठ प्रतिमा आजच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेला अधिक बळ देणारी आहे. सर्वसामान्य जनतेला नवा आत्मविश्वास देणारी आहे, हिंदू मुस्लिम भेदभावापलिकडे जाऊन, जातिभेदापलिकडे जाऊन माणसांसाठी नवे राज्य उभं करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. कुणी काही म्हटले तरी आपला शिवाजी हा आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणून तर आज साडे तीनशे वर्षांनंतरही रोज या रयतेच्या राजाची आठवण येते आणि सह्याद्रीचे खुले वारे गाऊ लागते –
‘ माझ्या घरची विशाल दारे, खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळ – वाकळ सकळांसाठी अंथरली.’
- डॉ प्रदीप आवटे



कुठला शिवाजी आमचा ?




शिवाजी दोन छावणीत विभागला आहे. एका छावणीला तो हिंदूपदपातशहा व मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून मिरवायचा आहे. तर दुसऱ्या छावणीसाठी तो केवळ कुळवाडी भूषणच नाही तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या स्वराज्याचा राजा आहे. रयतेचा राजा आहे.
ज्यांच्या पूर्वजांनी, हयातीतच शिवाजीला साथ देण्याऐवजी त्याची वारंवार कोंडी केली त्या शिलेदारांचे वारसदार पहिल्या छावणीत आहेत. ही स्वराज्यद्रोह्यांची छावणी !
दुसरी छावणी ज्यांचे पूर्वज शिवाजीसाठी प्राणार्पणास सिद्ध झाले त्या बारगीरांची आहे. हे मुख्यतः काटक कष्टकरी आहेत, ज्यांना मावळे म्हटले जाते.
पहिल्या छावणीला शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे, अफजलखानाचा कोथळा हा खूनखराबाच शिवाजीची ओळख बनवायचा आहे. पण याहून जास्त खूनखराबा केलेले पराक्रमी राजे इतिहासाच्या पानापानांवर तलवार परजताना दिसताहेत.
मग रयतेच्या मनात त्या महापराक्रमींना का स्थान मिळाले नाही ? याचे उत्तर इतिहासकार शेजवलकर अनाहूतपणे देऊन जातात.
शेजवलकरांनी शिवबाच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याची आठ भागात विभागणी केली व दाखवून दिले आहे की, त्यातील सात भाग हे शिवाजीच्या मुलकी कारभारातील व्यस्ततेचे आहेत व फक्त एक भाग लष्करी कारवायांचा आहे!
सतत कमरलेला तलवार लटकवलेला शिवाजी आम्हांला या स्वराज्यद्रोहींनी दाखवला आहे. रयतेच्या मनात स्थान मिळविलेला मुलकी कारभारातून आपले प्रजावत्सल मन सतत प्रगट करणारा शिवाजी त्यांनी दडवला.
शेती हा तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होता. महसूलाचा प्रमुख स्त्रोत तोच होता. हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा वारंवार बळी ठरतो, म्हणून त्याच्याकडून शेतसारा घेताना तो शेतीच्या उत्पादनाचे नियतकालिक अवलोकन करुन त्याप्रमाणे घ्यावा. जर पीकच पोटापुरते आले आहे तर शेतसारा माफ करावा. जिथे वरकड झाले आहे तेथे त्याप्रमाणातच पट्टी घ्यावी. बी बियाण्यास मोताद असणाऱ्यांना ते सरकारातून द्यावे आणि पीक आल्यावर ते उजवून घ्यावे. रोखीत मोबदला मागू नये. शेतकऱ्याला तोशीस पडेल असा व्यवहार अधिकाऱ्यांनी कदापि करु नये, अशी सक्त ताकीद देणारा राजा रयतेने त्याआधी अनुभवला नव्हता.
शेतजमिनची एकूण 17 प्रकारची प्रतवारी करून त्याप्रमाणे शेतकऱ्याची कुवत ठरविली जाई. केवळ किती क्षेत्र आहे यावर त्याची शेतसारा देण्याची कुवत निर्धारित केली जात नसे.
" रयतेच्या भाजीच्या देठासही तू निमित्त होता कामा नये. आंबा, साग आदी वृक्ष आरामाराचे बहुत उपयोगीचे. पण ही झाडे रयतेने आपल्या लेकरांसारखी वाढविली आहेत. ती तोडली असता त्यांच्या दु:खास पारावार काय ? हे वृक्ष धन्यास राजी करून रोकड मोजून घ्यावेत, बलात्कार सर्वथा न करावा ..." ही आज्ञापत्रातील काही वाक्ये आपल्याला शिवबा पिढ्यानपिढ्यांचे दैवत का बनला याचा प्रत्यय देतात.
शेतकऱ्याच्या बांधावर रमणारा, तलवारीवर नव्हे तर नांगरावर प्रेम करणारा आमचा शिवाजी आहे !
अफझलखानच्या बाजूने आपली पथके घेऊन उतरलेल्या शिळिमकर, बांदल, पिलाजी मोहिते, बाबाजी भोसले यांच्या वारसदारांनी आम्हाला शिवाजी शिकवू नये.
त्याचप्रमाणे मिर्झा राजे जयसिंगाला विजय मिळावा म्हणून यज्ञांआडून दक्षिणेची लाच लाटत स्वराज्याची सारी गुपिते मिर्झाला सांगून ज्यांनी शिवबावर नामुष्कीचा पुरंदर तह व आग्रा कैद लादली व दग्याने ज्यांनी संभाजी राजांना मोगलांकडे सुपूर्द केले त्या स्वराज्यद्रोही पळीपंचपात्रवाल्यांनी देखील आम्हाला शिवबा शिकवू नये !
ज्या आमच्या कष्टकरी मुस्लिम बांधवांच्या विरोधात सदोदित तुम्ही शिवाजी दाखवत आलात ते मुस्लिम शिवाजीशी जेवढे एकनिष्ठ राहिले तेवढे तुमचे पूर्वज राहिले नव्हते !
इतिहासाचे एक पान असे काढून दाखवा, जिथे शिवरायांच्या सोबत असणाऱ्या एका तरी मुसलमानाने त्यांना दगा दिलेला आहे.
एक पान असे काढून दाखवा, जिथे कुणी मांग, महार, बेरड, भिल्ल, रामोशी, भंडारी, कोळी, आग्री व सामान्य मराठा, कुणबी, माळी, धनगर, वंजारी आणि कारागीर जातीतून आलेल्यांनी शिवाजीशी दगलबाजी केली आहे.
आमचा शिवाजी हा हिंदूपदपातशहा नाही. गोब्राम्हण प्रतिपालक तर मुळीच नाही. तो रयतेसाठी, रयतेला घेऊन रयतेचे राज्य आणणारा, फक्त 'शिवबा' आहे !
- किशोर मांदळे, पुणे.




Wednesday, February 16, 2022

" Communalism of the majority is far more dangerous than communalism of the minority....“When the minority communities are communal, you can see that and understand it. But the communalism of a majority community is apt to be taken for nationalism.” ~Jawaharlal Nehru , May 1958.



Friday, February 11, 2022

विचारार्थ!


 लेखिका: कात्यायनी (हिंदी कवयित्री)
मूळ हिंदी लेखाची लिंक https://www.facebook.com/katyayani.lko/posts/4985444128213250
अनुवाद: जयवर्धन
कर्नाटकातील मांड्या प्री-यूनिवर्सिटी कॉलेजमध्ये हिजाब घालून जात असलेल्या एका मुलीला लांडग्यांच्या आणि जंगली कुत्र्यांच्या जमावाप्रमाणे भगवा दुपट्टा गुंडाळून जे गुंड घेराव घालून जय श्रीराम च्या घोषणा देत आहेत त्या चेहऱ्यांना ओळखा! हे आजच्या भारतातील ओळखीचे चेहरे आहेत: खुनी-उन्मादी चेहरे! त्यांचे चेहरे अगदी बर्लिनमध्ये ज्यू लोकांच्या घरांवर हल्ला करणाऱ्या, आग लावणाऱ्या आणि मॉब लिंचींग करणाऱ्या हिटलरच्या नाझी पार्टीच्या एस.ए. व एस. एस. तुकड्यांच्या गुंडांसारखेच आहेत!
ह्याच जमावाने पहलू खान, जुनेद आणि अखलाख सारख्या कित्येक निर्दोष लोकांचा रस्त्यावर पाठलाग करत खून केला होता. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशचे हत्यारे सुद्धा हेच होते! बागेत प्रेमीयुगुलांचा पाठलाग करणारे आणि रेस्टॉरंट्स मधून त्यांना हाकलून लावणारे जंगली हेच आहेत! ओडिसा मध्ये निर्दोष मुलींसहित पादऱ्याच्या संपूर्ण परिवाराला यांनीच जाळले होते! अयोध्यामध्ये 1992 साली बाबरी मशिद पाडण्यासाठी अशाच उन्मादींचा जमाव गोळा केला गेला होता आणि 2002 साली गुजरातमध्ये लूट, जाळपोळ, नरसंहार आणि सामूहिक बलात्कार करणारे तसेच गर्भवती महिलांचे पोट फाडून अर्भकांना त्रिशुलच्या टोकावर उचलणारे हेच होते! एवढेच नाही देशामध्ये रोज जिथे-तिथे दलितांवर अन्याय अत्याचार करणारे सुद्धा हेच चेहरे आहेत.
हे रुग्ण चेहरे व्यवस्थेच्या माराने निराश झालेल्या युवकांचा जमाव आहे ज्याच्यासमोर वित्तीय भांडवलाच्या सर्वात प्रतिक्रियावादी प्रतिनिधींनी एका काल्पनिक शत्रूला उभे करून सांगितले आहे की त्याच्या सर्व समस्यांचे मूळ तो शत्रू आहे. हा काल्पनिक शत्रू मुसलमान आहे, नंतर ख्रिश्चन आहेत, नास्तिक आहेत, कम्युनिस्ट आहेत आणि सनातन धर्माच्या चातुर्वर्ण्याला न मानणारे दलित आहेत आणि या सर्वांच्या बाजूने बोलणारे लोकशाही चेतना असलेले बुद्धीजीवी आहेत. हा पूर्णपणे एका 'खोट्या चेतनेच्या' जकडीत सापडलेला पशुसमान जमाव आहे ज्याच्या कडून कुठलेही बिभत्स काम करून घेतले जाऊ शकते. त्यांना विचारांशी, इतिहासाच्या तथ्यांशी काहीही देणे-घेणे नाही! इथपर्यंत की स्वतःच्या आपल्या धर्माचे सुद्धा एकपण पुस्तक त्यांनी वाचलेले नसते! धर्म आणि इतिहासाच्या संबंधात ते तेवढेच जाणतात जेवढे संघाच्या शाखेपासून तर व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना शिकविले जाते. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेसारख्या शब्दांशी त्यांना घृणा आहे आणि त्याला धर्माच्या विरोधात समजतात. या पिवळट-रुग्ण चेहऱ्यांच्या आणि घृणीत नजरेच्या पशुसमान जमावाच्या मागे जे निती-निर्माते, बुद्धिजीवी आणि शिक्षक बसले आहेत ते गुळगुळीट चेहऱ्यांचे फॅसिस्ट युद्ध विशारद आहेत आणि त्यांच्या मागे थंड डोक्याचे राजकारणी आणि भांडवलाचे सिद्धांतकार आणि थिंक टॅन्क्स आहेत. त्यामुळेच इतिहासाची वैज्ञानिक समजदारी असलेले लोक मानतात की फॅसिझम वित्तीय भांडवल आणि एकाधिकारी भांडवलाचे सर्वात प्रतिक्रियावादी (आणि आजच्या काळात भांडवलाचे सर्व छोटे मोठे भाग जवळपास समान रूपाने प्रतिक्रियावादी झालेले आहेत) रूप आहे आणि त्याच्या शक्तीचा मुळ स्त्रोत तृणमूल स्तरापासून संघटित अशा निम्नभांडवलदार वर्गाचे अत्यंत घनघोर प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन आहे. या टोकाच्या प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलनाचा सामना केवळ आणि केवळ तृणमूल स्तरापासून कामगारवर्ग आणि संपूर्ण कामकरी लोकसंख्येचे व मध्यमवर्गाच्या रॅडिकल गटाचे सामाजिक आंदोलन संघटित करूनच केला जाऊ शकतो!
गेल्या 35 वर्षांवर जर आपण नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की शांती-आंदोलने, मेणबत्ती आंदोलने, निवेदने-अहवालांनी या रक्तपिपासू शक्तींचा प्रतिकार केला जाऊ शकत नाही! सर्वधर्म-समभावच नव्हे तर भांडवली धर्मनिरपेक्षतेचे हत्यार सुद्धा यांच्या विरोधात कामी येऊ शकत नाही! निवडणुकीत त्यांच्या पक्षाला हरवून सुद्धा त्यांचे निर्मूलन केले जाऊ शकत नाही. सत्तेत नसताना सुद्धा ते त्यांच्या विघातक कार्यात लागलेले राहतील आणि ज्याअर्थी भांडवली समाजाच्या संकटांच्या कहरापासून सामान्य जनतेला कुठलाच भांडवली किंवा संसदीय डावा पक्ष मुक्ती देऊ शकत नाही, त्यामुळे उन्माद आणि लोकरंजकतावादाच्या सहाय्याने हे इतिहास-द्रोही फॅसिस्ट परत-परत सत्तेत येत राहतील आणि गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर मानवी रक्त आणि दहशतीचा पूर येत राहील. जे भांडवली पक्ष आज यांच्या विरोधात आहेत ते उद्या यांच्यासोबतच युती करतात आणि या बाबतीत इतिहासामध्ये नेहमीच सर्वात वाईट चरित्र विविध प्रकारच्या सोशल डेमोक्रॅट्सचे राहिले आहे. एका लांब ऐतिहासिक कालखंडाचा विचार करता फॅसिझम विरोधातील लढाई वास्तवात भांडवलशाही विरोधातील लढाईचा एक भाग आहे आणि भलेही कितीही उशीर झाला असेल, भलेही आपण कितीही मागे पडलो असू, या झोंबींच्याविरुद्ध दीर्घकालिक 'पोजीशनल वार' ची तयारी आपल्याला याच रूपात करावी लागेल! आपल्यालासुद्धा वस्त्या मोहल्ल्यांमध्ये सामाजिक आंदोलनाच्या स्तंभाच्या रूपात संस्था आणि जनसमुदायांचे विविध मंच बनवावे लागतील आणि त्या दिवसाची तयारी करावी लागेल जेव्हा खूनी फॅसिस्ट जमावाला युवा श्रमिकांची तुकडी रस्त्यावर धडा शिकवेल. जर बसल्या बसल्या विचार करत राहिलो तर हे लक्ष दूरचेच बनून राहील. व्यावहारिक आशावादी तोच असतो जो काहीतरी करतो. कुंठीतावस्थेच्या काळात इतिहास काही दिवसांच्या कामांना दशकांमध्ये किंवा कधी कधी तर शतकांमध्ये पूर्ण करतो! आणि नंतर तो कालखंड येतो जेव्हा तो दशकांच्या कामाला काही दिवसांमध्ये पूर्णत्वास नेतो. इतिहासाची द्वंद्वात्मक गती अशीच असते!
आमचे हे स्पष्ट म्हणणे आहे की कुठलाही अल्पसंख्याक धार्मिक समुदाय बहुसंख्याक धार्मिक कट्टरतावादाचा सामना धर्माच्या झेंड्याखाली संघटित होऊन करू शकत नाही. त्याला लढाऊ धर्मनिरपेक्षतेच्या झेंड्याखाली संघटित व्हावे लागेल आणि या गोष्टीला समजावे लागेल की धर्मनिरपेक्षतेचा अर्थ धार्मिक आस्थेला सोडणे किंवा नास्तिक होणे नसतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिकतेला किंवा अधार्मिकतेला मानण्याची पूर्ण हमी देतो आणि केवळ सामाजिक-राजकीय सार्वजनिक जीवनापासून धर्माला दूर ठेवण्याची गोष्ट करतो. जेव्हापण सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचा प्रवेश होईल तेव्हा धार्मिक अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवले जाईल. धार्मिक अल्पसंख्यांकांचा धार्मिक कट्टरतावाद बहुसंख्याकांच्या धार्मिक कट्टरतावादाला मजबूत तर करतोच, पण सर्वसाधारणपणे धर्माच्या झेंड्याखाली सुद्धा जर धार्मिक अल्पसंख्यांक संघटित झाले तर अन्य धर्मांचे सामान्य लोक आणि धर्मनिरपेक्षता मानणारे लोक स्वतःला वेगळे करून घेतील आणि बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरतावादाविरुद्ध संघर्षांमध्ये ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
काही गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या पाहिजेत! इथे हा प्रश्नच नाहीये की आम्ही किंवा तुम्ही हिजाब घालता किंवा नाही अथवा त्याला योग्य मानतात किंवा चुकीचे! जर कुठल्याही नागरिकावर राज्यसत्ता, धर्मगुरू किंवा आई-वडिलांद्वारे पोशाख सक्तीने थोपवला गेला नसेल तर पोशाखाचा प्रश्न पूर्णपणे एक व्यक्तिगत मामला आहे आणि आपण सक्तीने थोपवल्या जाण्याचा सुद्धा तेव्हापर्यंत विरोध करू शकत नाही जोपर्यंत त्याचे स्पष्ट पुरावे नाहीत आणि ज्याच्यावर थोपवल्या गेले आहे तेच त्याचा विरोध करत नसतील! कर्नाटकातील त्या मुलीच्या हिजाब घालण्यावर गुंडांनी नव्हे तर कायदा किंवा सरकारने सुद्धा बंदी लावली असती तर ते तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन असते आणि ते तेवढेच चुकीचे असते. काही "शांतीप्रेमी" "भलेमाणसांचे" हेसुद्धा म्हणणे होते की त्या मुलीने 'अल्लाहू अकबर' ऐवजी 'जय भारत' बोलायला पाहिजे होते. असे सुचवणे म्हणजे सल्ल्याच्या आडून देशभक्ती थोपवण्याचा धूर्त प्रयत्न तर आहेच सोबतच त्या गुंडांसमोर आत्मसमर्पणाचा भ्याड सल्ला सुद्धा आहे. तुम्ही 'अल्लाहू अकबर' घोषणेशी सहमत असाल किंवा असहमत, परंतु जर 'जय श्रीराम' चा नारा चुकीचा किंवा असंवैधानिक नाहीये तर 'अल्लाहू अकबर' चा कसा काय? काय हे प्रकारांतराने कुण्या मुसलमानाकडून देशभक्तीचे सर्टिफिकेट मागण्यासारखे आणि संघींच्या ह्या तर्काला स्वीकार करण्यासारखेच नाही का की ते "देशभक्त" मुसलमानांच्या विरोधात नाहीयेत? आणि नंतर त्यांची पुढची गोष्ट ही असते की वास्तवात मुसलमान देशभक्त असतातच फार कमी! जर कोणी मुसलमान देशभक्त असेल तर तो वंदे मातरम बोलून आणि गाऊन याचा पुरावा देईल! हेच फॅसिझम चे लॉजिक आहे! धार्मिक बहुसंख्यांकांच्या बाजूने एक खोटा बौद्धिक जमाव देशभक्तीची एक कसोटी बनवतो आणि नंतर रस्त्यावर कोणीही गुंड किंवा गाढव-डुक्कर उभा राहून लाठी घेऊन धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील कोण्या व्यक्तीला देशभक्त असण्याचा पुरावा मागू लागतो! शेवटी एखाद्या मुसलमानाला हा हक्क का नाही की जय श्रीराम चा नारा लावणाऱ्या लोकांमध्ये तोसुद्धा 'अल्लाहू अकबर' चा नारा लावेल? अजब दुटप्पीपणा आहे हा!
हिजाब च्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी गुंडांची गुंडशाही संपूर्ण कर्नाटकात पसरली आहे. पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची फक्त औपचारिकता तशीच करत आहेत जशी भाजपशासित राज्यांमध्ये केली जाते! आत्तापर्यंत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी, मोदींनी, शाह किंवा योगीने किंवा कुठल्याच भाजपच्या नेत्याने किंवा संघाच्या कुठल्याच नेत्याने या गुंडशाही वर एकही शब्द बोललेलं नाही. या गुंड जमावाच्या मागे संघ आणि भाजपच नव्हे तर राज्यसत्तेची संपूर्ण मशिनरी नग्नतेने उभी आहे. त्याचा एक उद्देश्य हा तर आहेच की पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अनेक प्रयत्न निष्प्रभ झाल्यानंतर आता अजून एक प्रयत्न करून बघितला जावा.
जयवर्धन मंढे









कर्नाटक के मांड्या प्री-यूनिवर्सिटी कॉलेज में हिजाब पहनकर जा रही एक अकेली लड़की को भेड़ियों और जंगली कुत्तों के झुण्ड की तरह भगवा गमछा लपेटे जो वहशी गुण्डे घेरकर 'जय श्रीराम' का नारा लगा रहे हैं, उन चेहरों को पहचानिए ! ये आज के भारत के परिचित चेहरे हैं : ख़ूनी, उन्मादी फ़ासिस्ट चेहरे ! इनके चेहरे हूबहू बर्लिन में यहूदियों के घरों पर हमले करते, आग लगाते और माब लिंचिंग करते हिटलर की नात्सी पार्टी के एस.ए. और एस.एस. के दस्तों के गुंडों जैसे ही हैं!
यही गिरोह था जिसने पहलू खान, जुनैद और अखलाक़ जैसे कई बेगुनाहों को सड़कों पर दौड़ाकर मौत के घाट उतारा था I दाभोलकर, पानसारे और गौरी लंकेश के हत्यारे यही थे ! पार्कों में प्रेमी जोड़ों का पीछा करने वाले और रेस्टोरेंट्स से उन्हें खदेड़ने वाले जंगली यही हैं ! उड़ीसा में मासूम बच्चियों सहित पादरी के पूरे परिवार को इन्होने ही जलाया था ! अयोध्या में 1992 में बाबरी मस्जिद गिराने के लिए ऐसे ही उन्मादियों की भीड़ जुटाई गयी थी और 2002 में गुजरात में लूटपाट, आगजनी, नरसंहार और सामूहिक बलात्कार करने वाले तथा गर्भवती स्त्रियों के पेट फाड़कर गर्भस्थ शिशुओं को त्रिशूल की नोक पर टाँगकर घुमाने वाले भी यही थे ! यही नहीं, देश भर में हर रोज़ यहाँ या वहाँ दलितों पर जो ज़ुल्म हो रहे हैं, उन्हें अंजाम देने वाले भी यही हैं !
यह पीले- बीमार चेहरे और फटी-फटी आँखों वाले, व्यवस्था की मार से निराश-पस्त युवाओं की वह आबादी है जिसे वित्तीय पूँजी के सबसे प्रतिक्रियावादी प्रतिनिधियों और उनके बौद्धिकों ने एक काल्पनिक शत्रु को इसके सामने खड़ा करके बता दिया है कि उनकी सारी समस्या की जड़ वही है ! यह काल्पनिक शत्रु मुसलमान है, फिर ईसाई हैं, नास्तिक हैं, कम्युनिस्ट हैं, और फिर सनातन धर्म की रीढ़ -- चातुर्वर्ण्य को न मानने वाले दलित हैं और इन सबके पक्ष में बोलने वाले जनवादी चेतना के बौद्धिक हैं ! ये पूरी तरह से एक "मिथ्या चेतना" की गिरफ़्त में जकड़ी पशुवत भीड़ है, जिससे कोई जघन्यतम, वीभत्सतम काम करवाया जा सकता है ! इन्हें विचारों से, इतिहास के तथ्यों से कोई मतलब नहीं ! यहाँ तक कि अपने धर्म की भी इन्होने एक भी पुस्तक नहीं पढ़ी होती है ! धर्म और इतिहास के बारे में ये बस वही जानते हैं जो शाखा से लेकर व्हाट्सअप यूनिवर्सिटी तक में इन्हें घुट्टी में पिलाई गयी है ! लोकतंत्र और सेकुलरिज्म जैसे शब्दों से ये रोम-रोम से नफ़रत करते हैं और इन्हें धर्म के ख़िलाफ़ समझते हैं ! पीले- बीमार चेहरों और फटी-वहशी आँखों वाली इस पशुवत भीड़ के पीछे जो नीति-निर्माता, प्रचारक और शिक्षक बैठे हैं, वे चिकने चेहरों वाले फासिस्ट युद्ध-विशारद हैं और उनके पीछे ठन्डे राजनीतिक और पूँजी के सिद्धांतकार और थिंक टैंक्स हैं ! इसीलिये इतिहास की वैज्ञानिक समझ से लैस लोग मानते हैं कि फासिज्म वित्तीय पूँजी और इजारेदार पूँजी के सबसे प्रतिक्रियावादी रूप ( और आज के युग में पूँजी के सभी छोटे-बड़े धड़े कमोबेश समान रूप से प्रतिक्रियावादी हो चुके हैं) की नुमाइंदगी करता है और इसकी शक्ति का मूल स्रोत यह है कि यह तृणमूल स्तर से संगठित निम्न-पूँजीपति वर्ग का घनघोरतम प्रतिक्रियावादी सामाजिक आन्दोलन है ! इस धुर-प्रतिक्रियावादी सामाजिक आन्दोलन का मुकाबला सिर्फ़ और सिर्फ़, तृणमूल स्तर से मज़दूर वर्ग और समूची मेहनतक़श आबादी तथा मध्य वर्ग के रेडिकल हिस्से का जुझारू सामाजिक आन्दोलन संगठित करके ही किया जा सकता है !
पिछले पैंतीस वर्षों पर ही अगर निगाह डालें तो यह बात साफ़ हो जाती है कि शान्ति-प्रदर्शनों, मोमबत्ती जुलूसों, ज्ञापनों-प्रतिवेदनों से इस पैशाचिक रक्तपायी शक्ति का मुकाबला नहीं किया जा सकता ! सर्व-धर्म-सद्भाव ही नहीं, बुर्जुआ सेकुलरिज्म के हथियार भी इनके ख़िलाफ़ काम नहीं आने वाले ! चुनाव में फासिस्टों की चुनावी पार्टी को हराकर भी इनका निर्मूलन नहीं किया जा सकता ! सत्ता में न रहते हुए भी ये अपनी दुष्टता में लगे रहेंगे और चूँकि बुर्जुआ समाज के संकटों के कहर से आम जनता को कोई भी बुर्जुआ या संसदीय वामपंथी पार्टी निजात नहीं दिला सकती, इसलिए उन्माद और लोकरंजकतावाद के सहारे ये खूनी इतिहास-द्रोही फासिस्ट फिर-फिर सत्ता में आते रहेंगे और गलियों में, सड़कों पर इंसानी लहू और आतंक की बाढ़ आती रहेगी ! जो बुर्जुआ दल आज इनके विरोध में हैं, कल इन्हींके साथ मोर्चा बना लेते हैं और इस मामले में इतिहास में हमेशा सबसे अधिक घिनौना चरित्र किसिम-किसिम के सोशल डेमोक्रेट्स का रहा है ! एक लम्बे ऐतिहासिक कालखण्ड की अगर बात करें तो फासिज्म के ख़िलाफ़ लड़ाई दरअसल पूँजीवाद के विरुद्ध लड़ाई की ही एक कड़ी है और चाहे जितनी भी देर हो चुकी हो; चाहे हम जितने भी पीछे छूट चुके हों, इन जोम्बियों के विरुद्ध दीर्घकालिक 'पोजीशनल वार' की तैयारी हमें इसी रूप में करनी होगी ! हमें भी बस्तियों-मुहल्लों में सामाजिक आन्दोलन के स्तम्भ के रूप में संस्थाएँ और जन-समुदाय के विविधरूपी मंच बनाने होंगे और उस दिन की तैयारी करनी होगी जब खूनी फासिस्ट दस्तों को सड़कों पर युवा श्रमिकों के दस्ते सबक सिखलाएँ ! अगर बैठे-बैठे सोचते रहेंगे तो यह लक्ष्य दूर की कौड़ी बना रहेगा I व्यावहारिक आशावादी वही होता है जो कुछ करता है I गतिरोध के दौरों में इतिहास चंद दिनों के कामों को दशकों, या कभी-कभी तो शताब्दियों में पूरा करता है ! और फिर वह कालखण्ड आता जब वह दशकों के काम को चंद दिनों में अंजाम दे देता है ! इतिहास की द्वंद्वात्मक गति ऐसी ही होती है !
हमारा यह स्पष्ट मानना है कि कोई भी अल्पसंख्यक धार्मिक समुदाय बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरपंथ का मुकाबला धर्म के झंडे तले संगठित होकर नहीं कर सकता ! उसे जुझारू सेकुलरिज्म के झंडे तले ही संगठित होना होगा और इस बात को समझना होगा कि सेकुलरिज्म का मतलब अपने धार्मिक विश्वास को छोड़ देना और नास्तिक हो जाना नहीं होता ! सेकुलरिज्म के उसूल हर व्यक्ति के धार्मिक या अधार्मिक निजी विश्वास को मानने की पूरी गारंटी देते हैं और सिर्फ़ सामाजिक-राजनीतिक सार्वजनिक जीवन से धर्म को दूर रखने की बात करते हैं ! जब भी सार्वजनिक जीवन में धर्म का प्रवेश होगा तो धार्मिक अल्पसंख्यक दोयम दर्जे के नागरिक हो जायेंगे ! धार्मिक अल्पसंख्यकों का धार्मिक कट्टरपंथ बहुसंख्या के धार्मिक कट्टरपंथ को तो मज़बूत करता ही है, सामान्यतः धर्म के झंडे तले भी अगर धार्मिक अल्पसंख्यक संगठित हों तो अन्य धर्मों के आम लोग और सेक्युलर आबादी से अपने को अलग-थलग कर लेंगे और बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरपंथ के विरुद्ध संघर्ष में कभी भी सफल नहीं हो सकेंगे !
कुछ बातें और साफ़ कर दी जानी चाहिए ! यहाँ यह सवाल है ही नहीं कि हम या आप हिजाब पहनते हैं या नहीं, अथवा उसे सही मानते हैं या गलत ! पहनावे का सवाल पूरीतरह एक व्यक्तिगत मसला है, अगर किसी नागरिक पर राज्य, धर्माधिकारी या माँ-बाप द्वारा उसे बलात थोपा न गया हो ! फिर हम बलात थोपे जाने का भी तबतक यूँ ही विरोध नहीं कर सकते जबतक इसके स्पष्ट प्रमाण न हों, और जिसपर थोपा गया हो वही इसका विरोध न कर रहा हो ! कर्नाटक की उस लड़की के हिजाब पहनने पर अगर गुंडे नहीं, बल्कि क़ानून या सरकार भी रोक लगाती तो यह उसकी निजी आज़ादी का हनन होता और उतना ही गलत होता ! कुछ "शांतिप्रेमी" लिजलिजे-गिजगिजे "भलमानसों" का यह भी कहना था कि उस लड़की को 'अल्ला-हु-अक़बर' की जगह 'जय भारत' बोल देना चाहिए था ! यह सुझाव की आड़ में बलात "देशभक्ति" थोपने की एक मक्कारी भरी कोशिश तो है ही, वहशी गुंडों के सामने आत्मसमर्पण की एक कायराना नसीहत भी है ! आप 'अल्ला-हु-अक़बर' के नारे से सहमत हों या असहमत, अगर 'जय श्रीराम' का नारा गलत या असंवैधानिक नहीं है तो 'अल्ला-हु-अकबर' भला क्यों है ? क्या प्रकारांतर से यह किसी मुसलमान से देशभक्ति का सर्टिफिकेट माँगने जैसा और संघियों के इस तर्क को स्वीकार करने जैसा नहीं है कि वे "देशभक्त" मुसलमानों के ख़िलाफ़ नहीं हैं? और फिर उनकी अगली बात यह होती है कि दरअसल मुसलमान देशभक्त होते ही बहुत कम हैं ! अगर कोई मुसलमान देशभक्त है तो वह 'बन्दे मातरम' बोलकर और गाकर इसका सुबूत पेश करे ! यही फ़ासिज्म का लॉजिक है ! धार्मिक बहुसंख्या की ओर से एक छद्म-बौद्धिक गिरोह खड़ा होकर देशभक्ति की एक कसौटी बनाता है और फिर सड़क पर कोई भी गुंडा-मवाली या गधा-सूअर खड़ा होकर लट्ठ तानकर धार्मिक अल्पसंख्यक समुदाय के किसी व्यक्ति से देशभक्त होने का सबूत माँगने लगता है ! आखिर किसी मुसलमान को यह हक क्यों नहीं है कि 'जय श्रीराम' के नारे लगाते लोगों के बीच वह भी 'अल्ला-हु-अक़बर' का नारा लगाए ? गजब दोगलापन है भाई !
हिजाब के मसले पर हिन्दुत्ववादी गुंडों का हुड़दंग पूरे कर्नाटक में फ़ैल चुका है ! पुलिस बस 'लॉ एंड ऑर्डर' को बनाये रखने की खानापूरी वैसे ही कर रही है जैसे भाजपा-शासित राज्यों में करती है ! अभीतक न तो कर्नाटक के मुख्यमंत्री ने, न मोदी, शाह या योगी या किसी भी भाजपाई नेता ने या संघ के किसी नेता ने इस हुड़दंग पर एक शब्द भी बोला है ! इन गुंडा गिरोहों के पीछे संघ और भाजपा ही नहीं राज्य की पूरी मशीनरी नंगई के साथ खड़ी है ! इसका एक मक़सद यह तो है ही कि पाँच राज्यों के विधानसभा चुनावों में साम्प्रदायिक ध्रुवीकरण के कई हथकंडे बेअसर होने के बाद अब एक और हथकंडे को आजमाया जा रहा
है !


On this day



11th February (1556), Prince Jalal Ud Din Muhammad, later known as Akbar ascended the throne as the 3rd Timurid/Mughal Emperor at the age of 14.
Akbar was tasked along with Bairam Khan to suppress the remnants of the Sur dynasty who were causing trouble within the Punjab region when Emperor Humayun unexpectedly died due to an accident. Bairam Khan would act as the regent of the young Akbar and played a crucial role in consolidating Timurid/Mughal rule over northern India.





Wednesday, February 9, 2022

हम सब कितने बदल गए









फ़ोटो (पेंटिंग) में आप चेचन महिला को देख सकते हैं जिसने अपने सर को ना ढक कर अपने हेजाब को हांथ मे ले रखा है, और हथियारबंद मर्दों के बीच में खड़ी है, और मर्दों ने महिला की जानिब से मुंह फेर रखा है(ग़ैर-महरम)
ये कॉकस (क़फ़क़ाज़) जिसका हिस्सा आज दाग़िस्तान, चेचेनिया सहित कई इलाक़े हैं, वहां आपसी ख़ूनरेज़ी रोकने के लिए इस तरह के ट्रिक का प्रयोग किया जाता था।
जब महिलाओं के ये लगने लगता था के मर्दों का दो गिरोह अब आपस में ख़ूनरेज़ी कर लेगा तो वो लड़ते हुए लोगों के भीड़ के बीच में आ जाती थी। और आते ही अपने हिजाब को उतार लेती थीं, और औरतों के सम्मान में तमाम मर्द अपना मुंह दुसरे जानिब फेर लेते हैं, जिससे लड़ाई ख़ुद ब ख़ुद रुक जाती थी।
उस्मानी तुर्कों के ज़ेर ए निगरानी रहने वाला ये इलाक़ा लड़ाकु क़बाईलियों का घर है, जिनके जीवन का एक ही मक़सद है लड़ना। रुस से पिछले 400 साल से लड़ रहे हैं।
वैसे इस्लामी नज़रिया में ग़ैर-महरम और महरम का कंसेप्ट बिलकुल ही क्लियर है, पर फ़हाशत और बेहयाई के इस दौर में ग़ैर-महरम और महरम का कंसेप्ट लोगों के बीच से ख़त्म होता जा रहा है।

I want to meet..


 

If Bravery Had A Face.


When Muslim girl arrives at PES College, She's been heckled by rental goons and several 'students' wearing #saffronshawls #KarnatakaHijabRow

Monday, February 7, 2022

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...

 मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय


रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


मधली सुट्टी होताच वाटर बॅग सोडुन नळाखाली हात धरून पाणी प्यायचय

कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय

सायकलच्या चाकांचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेळायचंय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का हा विचार करत रात्री झोपी जायचय

अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचय

घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


कितीही जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठीवर वागवायचय

कितीहि उकडत असू दे, वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....