Showing posts with label marathi kavita. Show all posts
Showing posts with label marathi kavita. Show all posts

Wednesday, April 19, 2023

अतीकची अति झाली मला मान्य आहे...



अतीकची अति झाली मला मान्य आहे,
पण पोलीसांच्या ताफ्यात त्याचा खुन व्हावा
मारेकऱ्यांच्या धाडसाची अन्
सरकारच्या षंढपणाची
कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
त्याने धरले असेल का हो
दर वेळी जनतेला बंदुकीच्या
धारेवर?
का मतदान करताना नसेल लोकांचे डोके
थाऱ्यावर??
एवढे कसले दबाव असेल हो साऱ्यांवर???
पाचवेळा त्याला निवडुन दिले
लोकांची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीक ची अती झाली मला मान्य आहे!!
एवढे गुन्हे करुन सुद्धा तो
तो निर्दोष सुटुन येतो?
एवढे धडधडीत पुरावे असताना देखील
न्यायासन त्याला सोडुन देतो??
का मग पेटी,खोके आणि मलाईची धमाल आहे??
न्यायालय,न्यायासन, न्यायधिशांची सुद्धा कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!
पाच पाच वेळा त्याला उमेदवारी मिळते
आमदारकी,खासदारकी दिली जाते
जेलमधुन सुद्धा निवडणुक लढविली जाते
तिकीट देणाऱ्या
पक्षांची पण कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अति झाली मला मान्य आहे!!
एवढ्या सराईत गुंडाला इतके काळ
पोलीसांनी सोडले कसे असेल हो वाऱ्यावर??
की मिठाईच्या पेट्या आणि नोटांच्या बॅगा
जात असतील त्यांच्या वाड्यावर??
अत्ताच अचानक कशी कर्तव्यदक्षता
जागी झाली
पोलीस प्रशासनाची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!!
चला अता देशाची सुटका झाली
अतीक च्या तावडीतुन!
सारीकडे शांतीची प्रस्थापना झाली
श्री रामाचे नाव घेऊन
बंदुकीच्या गोळीतुन!
पण संसेदत जे रामाचा मुखवटा धारण करुन रावण बसलेत
मग देशाला कसे सोडवणार त्यांच्या बेडीतुन???
का तुमच्या मते
सारेच स्वच्छमन,निष्कलंक,निष्पाप लोकांचेच हे सरकार आहे ???
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
का फक्त अतीकचीच अति झाली होती
हेच तुम्हाला मान्य आहे???
प्रा.डॉ.शहेजादी शेख





Friday, July 24, 2020

फोटोग्राफर

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव
त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

Tuesday, May 12, 2020

रमजान चे महत्व




पेट घेई धर्माचे युद्ध 
रक्त सांडले भूवरी 
सांगा पाहू रक्ताचा 
कोणता धर्म त्यावरी

मुसल्ली - मुल - इस्लाम 
हाच त्यांचा खरा अर्थ 
रमजान चा महिना सण पवित्र 
सुटे रोजा चंद्र दर्शन जाण मर्म 

जन्म माणूस देवाची देणगी 
धर्म शिकवी ईश्वर अल्ला 
मग माणूस का करती
जातिभेदाचा कल्ला 

दिन दुबळ्यांना दान
धर्म जकात सांगतो
राम रहीम प्रेमाचे गोडवे गातो
पवित्र कुराणाचा संदेश ऐकतो

रोजे रमजानचे 
मुस्लिमांचे पर्व 
विसरून जाती भेद
राहु एकोप्याने सर्व 

सौ. रोहिणी अमोल पराडकर 
    कोल्हापूर.

Tuesday, February 11, 2020

भारत माझा

स्वप्नांत आला भारत माझा
भारत माता रडली आता 
बघ माझी हिरवी साडी 
झाली आता तांबूस काळी   
बघ माझे पाणीदार डोळे 
झाले ते काळे निळे 
श्वास हा माझा काळाधूर जसा  
अरे कोपला आता निसर्ग हा 
स्वप्नातील सुंदर स्वच्छ भारत  
अरे आठवा  स्वप्न महान क्रांतिवीरांचे  
स्मरूनी त्यांच्या बलीदानास 
ध्यानी मनी जागवा देशप्रेम  
नका विकू स्वाभिमान देशद्रोहींना 
पेटवा मशाली सुवर्ण भारताच्या 
करू या विकास स्वातंत्र्य भारताचा 
हिच खरी श्रद्धांजली अर्पूनी छ. महाराजांना  
घेऊ प्रेरणा त्यांच्या अनमोल विचारांची 
नको नुसते कानात डूल कपळावर चंद्र कोर   
मिळूनी सारे घडवू स्वप्नातील भारत छान 
करू विकास भारताचा 
धरु प्रगतीची आस 
तरच खऱ्या अर्थाने होईल 
   भारत माझा महान

|| भारत माता की जय ||  

   सौ. रोहिणी अमोल पराडकर 
               कोल्हापूर

शब्द

शिर्षक   शब्द 

शब्दा ने शब्द वाढतो
शब्द वाढला तर होतो वाद 
शब्द जर निःशब्द झाला. 
तर होते मौन 
शब्दात शब्द मिसळला 
तर संवाद खुलतो 
जुळला शब्द तर 
संवाद  फुलतो. 
शब्द जर ह्रदयात घुसला 
तर प्रेम जुळते
अन् शब्द जर डोक्यात घुसला 
तर नाते तुटते
शब्दाचे मोल
जपून बोल
   
      सौ. रोहिणी अमोल पराडकर 
                     फोटोग्राफर
                                                  Mrs. Rohini Amol Paradkar, Kolhapur.
१.
पुवीॅ   माणूस   जेवण   घरी   
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे.

२.
पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे. 
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये. 
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण 
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.

३.
पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या. 
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या.  
आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात. 
आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.

४.
पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा    
तो    गरीब   समजला   जायचा. 
आता    माणूस   कारने  जिममध्ये  जातो  
अन् सायकल चालवतो !

५.
पुर्वी वायरीच्या फोनने 
लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने
 जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!

६.
पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा 
 मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला 
ढाबा शोधायला जातो !

७.पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन् 
हातातले फोन स्मार्ट झालेत .

८.पूर्वी रस्ते मातीचे अन् 
माणसे साधी होती ...
आत्ता रस्ते डांबरी अन्
माणसे डांबरट झालेत ...


🙃🙃पटलं बुवा आपल्याला ..

Saturday, January 18, 2014

BABY GIRL SISTER

ही कविता खास ज्यांना बहिण नाही त्याच्यासाठी..................

लहानपणी वाटे, एक बहिण असावी..
एक गोळी तीला चिमणीच्या दाताने तोडून द्यावी,
उरलेली अर्धीही तीलाचं द्यावी..

एक बहिण असावी..
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी खावी,
नंतर मात्र तीलाचं एक ठेऊन द्यावी..

एक बहिण असावी..
चीडवायला तीला फार मजा यावी,
पण रडू ती लागताचं जिवाची घालमेल व्हावी..

एक बहिण असावी.....
पहिल्या माझ्या पगारात तीला छान गिफ्ट आणावी,
आणि गिफ्ट हातात पडताचं तिने वर पार्टीही उकळावी..

एक बहिण असावी..
असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे,
एक बहिण असावी.. पण ?????

मला बहिण का नसावी ?
त्यामुळे राखी पोर्णिमा माझी सूनीसुनी जावी..

आणि अचानक आयुष्यात माझ्या एक छोटुकली यावी..
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून सख्खी वाटावी..

एक बहिण यावी.. तीच्याशी बोलताना माझीसुःख दुःखे सांगावी,
सांगता सांगता तीचीही जाणून घ्यावी..

खरचं घर मुलीशिवाय अपूर्ण असतं...!

Sunday, January 5, 2014

MARATHI KAVITA

दोघांचं सकाळी भांडण होण
तरी जाताना एकमेकान कडे बघण
ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठवण काढण
आणि हळूच लंच मध्ये एक मिस काल देण
मी कॉल केल्यावर चुकून लागला म्हणन
आणि ऑफिस मधून येताना माझ्यासाठी गुलाबाची फुले घेण
उगीच मला घरी पोचण्य आधी रस्त्यात भेटायला बोलावण
आणि मग गुलाबाची फुले देऊन खुश करण
दोघांनी घरी जाण्या आधी हॉटेल मध्ये कॉफी पिण
अश्या आठवणी येऊ लागल्या कि अवघड होत
वर्तमाना कडे बघण
आणि मग विचार येतो
पुसटशी तरी आठवण येत असेल कधी तुलाही..................

MARATHI KAVITA

मी म्हंटले मित्राला एकदा
मला प्रेमात पडायचय
कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतं
असलं काहीतरी अनुभवायचाय

मित्र म्हणाला
आरशात बघ न जरा
स्वतःवर प्रेम करायचं शिक जरा
मग बघ किती सुंदर हि धरा

मग मी थोडी विचारात पडले
डोळ्यातून दोन थेंब हि गळले

विचार केला
स्वतःवर प्रेम करायचं कसं?
एकटच प्रेमात पाडायचं कसं?
इतके थेंब अंगावर पडतात
पण एकटच पाऊसात भिजायचं कसं?

Saturday, December 28, 2013

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..



आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे.!
अश्रूच यार माझा
मदिरेसमान आहे !
काट्यातही फुलांची
झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते
दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थ म्हणतो
तो बेइमान आहे

Wednesday, November 6, 2013

MARATHI KAVITA - HAAPY DIWALI

आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते....

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.....

अस काहीस मागण देवाकडे मागत
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात
दिवाळीची पोस्त गोळा करायला …

Monday, November 4, 2013

HAPPY DIWALI



आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते.... 

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..... 

अस काहीस मागण देवाकडे मागत 
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात 
दिवाळीची पोस्त गोळा करायला …

Tuesday, October 29, 2013

MARATHI KAVITA

रोजच्याच परी, सकाळ कोवळी
विरह मनास, जीव हा तळमळी
चडली प्रीतीवर निराशेची काजळी
सखे ऐक न, मनाची आर्त आरोळी

राग नाही बरा, रुसलीस का अवखळी
प्रेमात मी तुझ्या असे, किती ग प्रांजळी
मन भरून येते, रितीच असतील ओंजळी
किती विनवू तुला, का चिडतेस वेळो-वेळी

तुजवीण ग, जीवनात एक पोकळी
जाणून आहेस, तरी खेळतेस हि खेळी
का उगाच, छटा दावितेस अशी वेगळी
ये परत तू, बघ राहील हा मी निर्जळी ....




Written By : Anamika Author

Tuesday, October 22, 2013

MARATHI KAVITA

एवढ्या सुंदर जगण्यासाठी नुसतं Thanks म्हणा.....

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात....
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात......!!

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,...
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिलं पाहिजे.......!!

आंघोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या.....,
आरश्यासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आल पाहिजे.......!!

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमल पाहिजे,......
वेडेवाकडे अंग हलवत
नाचणसुद्धा जमल पाहिजे.........!!

गीतेचा रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण.....
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे......!!

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,......
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.......!!

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.......!!

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?.....
एक गजरा विकत घ्या
ओँजळभरुन फ़ुलाचा नुसता श्वास घ्या ......!!

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,......
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा......!!

-अनोलखी कवीचे साभार

Thursday, September 12, 2013

Random thoughts (in Marathi)


prahari vajanarya alarm la shanth karave mhanto, tya jast zhopnyala thoda vel dyava mhanto

sakalchya dhandlit thodi excercise karavi mhanto, eka maghe ek paaul takat thode jog karave mhanto

office madhye velat pohchave mhanto, boss chya observations na challenge karave mhanto...ya process madhye thode kaam karane hi enjoy karave mhanto

mitranshi honarya phone calls chi frequency vadvavi mhanto, tya gappa gosthi na aankhi thoda vel dyava mhanto

office kamatun sutti ghyavi mhanto...k ek varsh 'valley of flowers' la jave mhanto

divschya gadbadi madhye thoda pause ghyava mhanto...tya pause madhye thode swatala samjhun ghyave mhanto...ya samajnya va n samjnya madhye aayush jagave mhanto



BY PRITHVIRAJ MOHITE, KOLHAPUR

Sunday, April 28, 2013

घुमट



माणसं भेटतात, प्रसंग आठवतात.
मनात भावनांची गर्दी झाली की शब्द अबोल होतात,
बुद्धी परकी होते, फक्त आपल्यासाठी का होईना काळाचं चक्र थांबतं.

खूप काही बोलायचं असतं, पण नेमक्या शब्दात मांडणं कठीण होऊन जातं.
काय सांगावं, कसं सांगावं, काय आधी सांगावं, सांगितलंच पाहिजे का?
हे विचार करता करता सगळंच सांगायचं राहतं.

युद्धभूमीवर सामान्य सैन्य पुढे करून राजाने मागून सगळं रणांगण पहावं तसं
शब्दांच्या गिचमिडीत नेमके हवे तेच शब्द मागे राहतात.
मग जाणवतं की,
जे शब्द ओठातून निसटतात, ते अगदी शुल्लक असतात.
जे लपून राहतात, ते खरे योद्धे असतात. त्यांनी लढायला हवं होतं.

घुमटामध्ये आवाज घुमतो, प्रतिध्वनी ऐकू येतो. पण....
घुमट समजून खुल्या आभाळाखाली जोरात किंकाळी मारून प्रतिध्वनीची वाट पाहण्यात काही अर्थ नसतो,
आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येत नाही.
येईलच कसा ?
परत यायला आवाजही आभाळाच्या संपण्याची वाट पाहत धावत असतो पण आभाळ संपतच नाही.
आभाळ हि अनंताकडे स्वतःचा अंत मागत असतं.
आवाज काही परत येत नाही आणि वाट पाहणाऱ्याची वाट पाहणं हि संपत नाही.
मग एकटेपणाशी भेट होते.

"वर्तमानात आवडत्या माणसाला वेळ नाही दिला कि,भविष्यातला बराचसा वेळ एकटेपणाला द्यावा लागतो.".......
so keep humanrelation.......……. शेवटी माणसेच असतात......