Sunday, February 27, 2022

गावकरी



गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?
नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?
नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?
नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

गावकरी(फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय! विमानतळमध्ये गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय?
नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ! दादाला सांग दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्याबाबांना विचार घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ. मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे.'
लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया.

No comments:

Post a Comment