Monday, November 10, 2025

कलकत्ता की टीपू सुल्तान मस्जिद का निर्माण टीपू सुल्तान के बेटे शहज़ादे ग़ुलाम मुहम्मद अनवर शाह ने अपने वालिद टीपू सुल्तान की याद में 1842 में करवाया था।


 

गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल गांधीजींना पाण्यात पहायचा. एकवीस दिवसांच्या उपोषणा दरम्यान गांधी नक्कीच मरून जातील असा त्याला विश्वास होता. नवव्या दिवसानंतर गांधी जिवंत आहेत म्हणल्यावर त्यानं भारतात व्हाईसरॉयला तार केली की गांधी पाण्यातून ग्लुकोज घेतात का याची खातरजमा करा. व्हाईसरॉयनं रिपोर्ट दिला की तसं अजिबात काहीच गांधी करत नाहीत.
विशेष म्हणजे इकडे गांधी उपोषणात असतांनाच चर्चिलही ॲडमिट होते आणि त्याकाळी अशक्य समजला जाणारा न्युमोनियानं ग्रस्त होते पण तरीही 'म्हातारा मरण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही' अशा तारा भारतात इंग्रज प्रशासनाला करत होता.
गांधीजींना राजानं बकिंगहॅम पॅलेसमध्ये चहापानासाठी बोलवलं. गांधीजी पंचा नेसून जाणार म्हणल्यावर चर्चिलनं मुक्ताफळं उधळली. निर्धाराप्रमाणे गांधीजी पंचा नेसून गेले. बकिंगहॅम पॅलेस बाहेर ब्रिटीश माध्यमांनी गर्दी केली होती. पत्रकारानं विचारलं 'श्रीमान गांधी, या अशा दरिद्री वेषात तुम्ही राजाला भेटणार? तुमच्याकडे यापेक्षा अधिक कपडे नाहीत'?
गांधी त्यांचं जगप्रसिद्ध हास्य चेहर्‍यावर आणून मिश्कीलपणे म्हणाले 'मला आणि राजाला दोघांनाही पुरतील एवढे कपडे राजानं घातलेले आहेत!'
वरवर बघता एक विनोद पण अंतर्यामी शोषणाची सल सांगणारं हे वाक्य.
पहिल्यांदा ब्रिटीश पार्लमेंट आतून पाहिली तेव्हा तिच्याकडे रोखून पाहणारा कमरेवर हात ठेवलेला चर्चिलचा पुतळा पाहिला. पार्लमेंट स्ट्रीटवर आपला म्हातारा कणखरपणा दाखवत पुतळ्यातून उभा आहे.
मनात विचार आला की चर्चिलचा पुतळा तर दुसरं महायुद्ध जिंकलं म्हणून उभारला पण आमचा म्हातारा तर युद्धविरोधी, एकही युद्ध न लढता प्रेमानं जग जिंकणारा, त्याचाही पुतळा उभारला आहे. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ असल्याचा हा पुरावा.
बाकी ज्यानं आपलं साम्राज्य उधळून लावलं त्याचाही पुतळा आपल्या संसदेच्या आवारात लावणाऱ्या ब्रिटीशांच्या गुणग्राहकता आणि खिलाडू वृत्तीचीही दाद दिली पाहिजे.
आणि हो, गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



माहुली किल्ल्याचे सन १८२० मधील चित्र. यामध्ये किल्ल्याखाली असलेली छावणी दिसून येईल..


 

महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलन



महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला होता आंदोलनात सहभागी झालेले डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली होती
मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर जगातील सर्व मुस्लिम धर्माचा खलिफा असल्याचे मानले जाते. खिलाफत ही धार्मिक राजकीय इस्लामिक संज्ञा आहे. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानचे सुलतान खलिफा वर ब्रिटिशांनी लादलेल्या अटीविरुद्ध भारतीय मुसलमानाने ही चळवळ सुरू केली या चळवळीने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला.
काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रायव्हसीचे प्रदेश सचिव डॉ. केशव बळीराम हेडगेवार 1921 ते 1922 खिलाफत चळवळीच्या बाजूने ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन करीत असताना हेडगेवार यांनी अत्यंत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षासाठी तुरुंगात टाकले.
संघ शाखेवर मुस्लिम द्वेषाचे पाठांतर करून घेतल्या जाते. त्यामुळे डॉ.हेडगेवारानी स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींनी पुकारलेल्या खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतला होता हे संघ स्वयंसेवक सांगू शकत नाहीत.
ब्रिटिश तुरुंगातील कैद्यांना भूक आजार कठोर परिश्रमामुळे कमकुवत झालेले असत .जेलमध्ये असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न कोंदट वातावरणामुळे तुरुंगातील कायद्यांना टी.बी. सारख्या आजार जडले जात असत. तुरुंगातील हालअपेष्टामुळे भारतीय कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याची तब्येत ही कमजोर आणि एखाद्या आजाराने जडलेली असायची.
ब्रिटिश जेलर सर जाठर हा अत्यंत कठोर आणि उग्र स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता .हेडगेवार यांनी त्यांच्याशी सौहार्दपुर्ण संबंध निर्माण केले. इतर कायद्याचे जेलमधील हाल अपेष्टामुळे वजन कमी झालेले असायचे मात्र हेडगेवार यांची वजन 11 किलोने वाढलेले होते.
1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली
हेडगेवार यांनी आपल्या संघ कार्यकर्त्याला स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितले स्वतः मात्र सहभागी झाले ते आरएसएस चे प्रमुख म्हणून नाही तर प्रमुख पद दुसऱ्याला देऊन केवळ हेडगेवार म्हणून आंदोलनात भाग घेऊन जेलमध्ये गेले.
हेडगेवार यांचा दुसऱ्यांदा जेलमध्ये जाण्याचा उद्देश हा होता की काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या आरएसएस मध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. एकही काँग्रेस कार्यकर्ता हेडगेवार यांच्या नादाला लागला नाही.
दोन ऑक्टोबर 2025 रोजी आर एस एस ला 100 वर्षे झाले पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरएसएस आणि हेडगेवार वर लेख लिहिले कुणाच्याही लेखांमध्ये हेडगेवार यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला हे लिहू शकले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य गाभा हा इतर धर्मियांचा द्वेष करणे हा आहे. मुस्लिम द्वेषातून आर एस एस भाजप सत्य पर्यंत पोहोचलेले आहेत .त्यामुळे त्यांचा खरा इतिहास ते कधीही स्वतःहून सांगणार नाहीत.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके.
सादोळा ता माजलगाव जि बीड




Monday, November 3, 2025

A new study suggests that - in the year 2032 - Earth will encounter a thick part of the #Taurid #meteor swarm. The cometary debris in the swarm - potential Taurid meteors, aka Halloween fireballs - could bring an increased risk of airbursts, or explosions in Earth's atmosphere, in both 2032 and 2036.

Read more, here: 
https://earthsky.org/.../halloween-fireballs-airburst.../