तोफ वजन 55 टन, लांबी 14.6 फूट आणि डायमीटर 4.9 फूट. तिच्या ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकद लागत होती. (फारसी शब्द-अर्थ: मैदानाचा राजा)
आज जरी ती तोफ आदिलशाहीची म्हणून ओळखली जात असली तरी या तोफेचा जन्म मूळ निजामशाहीमध्ये झाला. १५४९ साली बुर्हान निजामशहा याच्या तोफखान्यातील तुर्की अधिकारी चलबी रुमीखान दखनीयाने ही तोफ अहमदनगर येथे बनवली. रुमीखान हा मूळचा तुर्कस्तानचा होता. मलिक-ए-मैदान तोफेच्या निर्मितीच्या वेळी, म्हणजेच सोळाव्या शतकात, ती जगातील सर्वात मोठी शस्त्रे मानली जात होती.
तोफेचा धमाका एवढा मोठा होता की बत्ती देणारा सैनिक मरण्याची शक्यता असल्याने शेजारीच एक पाण्याचा हौद बांधलेला आहे. बत्ती दिली की सैनिकाने लगेच हौदात उडी मारून पाण्यात बुडी मारून बसायचे!
विजयनगरजवळील रक्कस-तंगडी येथे झालेल्या युद्धात या तोफेचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. या तोफेचा आवाज एवढा प्रचंड होता की विजयनगरच्या राज्याचे सैन्य आवाज ऐकूनच पळून गेले होते.
युद्ध संपल्यानंतर या तोफेला तेथून 80 किमी दूर असलेल्या पुरंदरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुरंदरच्या किल्ल्यातून इ.स. 1632 मध्ये एका मराठा सरदाराने या तोफेला कर्नाटकातील विजापूर येथे स्थापित केले होते.
No comments:
Post a Comment