Friday, June 20, 2025

10 Powerful Quotes About Decision-Making


Every choice we make shapes our future. Here are 10 inspiring quotes to remind us of the power of decisiveness:
"Indecision is the thief of opportunity."– Jim Rohn
"If you don't make decisions, others will make them for you."– Harvey Mackay
"Determination is a trait shared by all successful people. Failure stems from a lack of decisiveness."– Tony Robbins
"Decisiveness is a hallmark of high performers. Almost any decision is better than no decision at all."– Brian Tracy
"Once you make a decision, the universe conspires to make it happen." – Ralph Waldo Emerson
"The hardest thing is making the decision to act, the rest is just tenacity." – Amelia Earhart
"The secret of getting ahead is getting started..."– Mark Twain
"It is in your moments of decision that your destiny is shaped." – Tony Robbins
"Make a decision and watch your life move forward." – Oprah Winfrey
"The greatest mistake you can make in life is to be continually fearing you will make one." – Elbert Hubbard

Bonus Wisdom:

"Life is about decisions, and you can't make them if you're afraid of making mistakes."


"When you can't choose between two equally balanced paths, choose the bolder one."




Wednesday, June 18, 2025

Ants Outsmart Scientists One Seed at a Time







Ants might be tiny, but when it comes to survival smarts, they’re lightyears ahead of us in some ways.
Case in point: scientists have discovered that ants break grains and seeds before storing them, a strategic move that prevents germination even under perfect growing conditions.
It’s their way of stockpiling food without the risk of it sprouting and becoming useless.
But here's where it gets fascinating.
While studying ant nests, researchers stumbled upon something unusual coriander seeds weren’t halved like most others… they were quartered. Curious, they took the mystery to the lab. What they found stunned them: coriander seeds still germinate when halved, but not when broken into four pieces.
In other words, the ants had already figured this out.
Long before any lab coats ran the experiment, these tiny creatures knew exactly how to neutralize coriander's ability to grow. It wasn’t just instinct it was precision agriculture, on a micro scale.
This jaw-dropping insight is a reminder that nature’s smallest engineers often have knowledge we’re only just beginning to uncover. Ants aren’t just survivors they’re strategists, and they may have more lessons to teach us than we realize.

Remission for Reading





Since 2012, Brazil has implemented a program known as "Remission for Reading," which allows prisoners to reduce their sentences by reading books and writing reports. For each approved book report, inmates can have four days deducted from their sentence, with a maximum of 12 books per year, totaling up to 48 days annually. The program aims to promote literacy, critical thinking, and personal development among inmates, facilitating their rehabilitation and reintegration into society. Participants select books from the prison library, which includes materials in Braille, audiobooks, and foreign languages to accommodate diverse needs. After reading, inmates have 10 days to write a review demonstrating their understanding of the text. These reviews are evaluated by a commission comprising educators, librarians, and civil society representatives. This initiative has been recognized for its positive impact on inmates' lives, offering them a constructive way to reduce their sentences while fostering personal growth and reducing recidivism.


हैदराबाद की उस्मानिया यूनिवर्सिटी के स्टूडेंट साल 1944 में कुछ इस तरह दिखते थे।


 

जागतिक मल्लखांब दिवस










आज जागतिक मल्लखांब दिवस. मल्लखांब हा अस्सल भारतीय मातीतला लाकडी खांबावर किंवा लवचिक दोरीवर केला जाणारा परिपूर्ण असा व्यायामप्रकार! शारीरिक चपळता, लवचिकता, मानसिक एकाग्रता, पोटातील शक्ती या साऱ्याची सुरेख गुंफण असणारा हा पारंपरिक व्यायामप्रकार आपल्या पूर्वजांनी कित्येक शतकांपूर्वी निर्माण केला. मल्लखांबाच्या इतिहासाचे आपल्याकडे प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिशकालीन आणि आधुनिक असे चार भाग पडतात. या चारही कालखंडात मल्लखांबाबद्दलच्या विविध नोंदी आपल्याला लिखित आणि चित्रित स्वरूपात सापडतात. प्रसृत समजांनुसार अठराव्या शतकात बाळंभट्ट देवधरांशी याचा इतिहास जोडला जात असला तरी वास्तविक मल्लखांबाचा इतिहास त्याहून कित्येक शतके मागे जातो. आज मल्लखांब दिनाच्या निमित्ताने या पारंपरिक व्यायामप्रकाराचा एक मागोवा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मल्लखांबाचे ऐतिहासिक संदर्भ भारतीय इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांच्या तुकड्यांमध्ये सापडतात. संदर्भांची ही मालिका काही काळात तुटक झालेली दिसते (पण अर्थात, ही संशोधनातली दरी..क्रीडा सातत्यातली नाही). १९५७ ते १९६८ याकाळात आशुतोष म्युझिअम ऑफ इंडियन आर्ट या संस्थेकडून पश्चिम बंगालच्या विद्याधारी नदीजवळच्या ‘चंद्रकेतूगढ’ (२४ परगना जिल्हा) गावामध्ये उत्खनने झाली. या उत्खननांमध्ये इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे पाचवे-सहावे शतक या काळातले मातीच्या वस्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले. यातल्या तिसऱ्या-चौथ्या शतकातल्या एका मातीच्या भांड्यावर एका खांबावर कसरत करणाऱ्या व्यक्तीचे चित्रण आढळून आले होते. भारतातल्या मल्लखांबाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्राचीन संदर्भ म्हणता येईल.
भारतातले खेळ, कसरती, व्यायाम यांच्याबद्दल परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदी कायमच महत्वपूर्ण स्रोत ठरल्या आहेत. सातव्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी ह्यूएन त्सांग हा अतिशय महत्वाच्या प्रवाशांपैकी एक. ह्यूएन त्सांगने इसवीसन ६२९ ते ६३९ याकाळात वाराणसीला मुक्कामी असताना तत्कालीन मल्लखांबाबद्दल नोंद करताना लिहिले आहे, “इथल्या नदीच्या मध्ये एक स्तंभ रोवलेला आहे. सूर्यास्ताच्या वेळी साधक या खांबावर चढून एक हात आणि एक पायाने हा खांब पकडून दुसऱ्या हात आणि पायाने यावर वेगाने कसरती करतात. हे दृश्य फारच मनोहारी दिसते”. अशा प्राचीन लिखित संदर्भांमधून विशिष्ट खेळ, व्यायामप्रकार कसा विकसित होत गेला याची ससंदर्भ माहिती आपल्याला मिळत जाते.
मधल्या काळातल्या काही तुटक संदर्भांनंतर ‘मल्लखांब’ समोर येतो ते बाराव्या शतकातल्या कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय याने लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ ग्रंथामध्ये, तेही अगदी विस्तृतपणे! मानसोल्लास ग्रंथाचे काही भाग युद्ध, शस्त्र यांच्यासोबतच सैनिकांनी युद्धासाठी आणि शारीरिक श्रमांसाठी करण्याच्या व्यायामांचेही वर्णन करतात. यात सैनिक, विशेषतः मल्लांनी स्तंभावर व्यायाम करण्याच्या ‘स्तंभ श्रम’ अर्थात मल्लखांबाचे वर्णन केलेले आहे. यात राजा सोमेश्वराने स्तंभश्रम करताना “स्तंभ हातात पकडण्यायोग्य, उंच, खोल भूमीमध्ये गाडलेला, चंदनाने लिप्त असावा. स्तंभावर चढताना उडी मारून मांड्यांनी स्तंभ पकडावा किंवा हात, छाती आणि पायांचा वापर करून त्यावर चढावे. स्तंभाला हातांनी आणि पायांनी पकडून विविध आवर्तन-विवर्तने (दशरंग हात) करून स्तंभश्रम करावेत”, अशा अनेक बारकाव्यांनिशी तत्कालीन मल्लखांबाची माहिती दिलेली आहे.
मल्लखांबाबद्दल इतक्याच विस्तृतपणे माहिती देणारा दुसरा महत्वपूर्ण संदर्भ म्हणजे ‘मल्लपुराण’. मल्लपुराणाच्या नेमक्या कालखंडाबद्दल प्रवाद असले तरी सर्वसाधारण या ग्रंथाचा कालखंड इसवी सनाचे तेरावे ते सतरावे शतक यादरम्यानचा मानला जातो. मल्लपुराणामध्ये मल्लविद्येसोबतच मल्लविद्येला पूरक व्यायामप्रकारांची सविस्तर माहिती देताना त्यात स्तंभश्रम, अर्थात मल्लखांबाच्या नियमित सरावाने खांदे रूंद होतात, तळहात, जांघा, मांड्या यांची पकड वाढते, अंग लवचिक राहते, हात, कंबर, पाय, घोटे यांची शक्ती वाढते, संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो हे मल्लखांबाचे फायदे नोंदवलेले आहेत.
मल्लखांबाचे जसे लिखित पुरावे बाराव्या ते सतराव्या शतकापर्यंत सापडतात तसेच ते विविध चित्र स्रोतांमधूनही दिसून येतात. सोळाव्या-सतराव्या शतकात भारताच्या विविध भागात तयार झालेल्या ‘राग-रागिणी’ चित्रांमध्ये, विशेषतः ‘देसख्य’ / ‘देसख’ रागिणी चित्रांमध्ये मल्लखांबावर कसरती आणि व्यायाम करणारे मल्ल, खेळाडू दिसून येतात. यातली महत्वाची बाब म्हणजे या चित्रांमध्ये स्त्रियादेखील मल्लखांब खेळताना दाखवलेल्या आहेत. अगदी सार्वत्रिक नसले तरी हा खेळ शिकण्यास, खेळण्यास मनाई नव्हती असे या चित्रांमधून स्पष्ट दिसून येते. यातल्याच काही चित्रांमध्ये खांबासोबतच दोरीचा मल्लखांब सुद्धा दिसून येतो, त्यामुळे दोरीचा मल्लखांब हादेखील मूळ मल्लखांबाइतकाच प्राचीन आहे असे वाटते.
ब्रिटिशकाळात सशस्त्र क्रांतीला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी भारतात शस्त्रबंदी लागू करण्यासोबतच पारंपरिक युद्धकला, मर्दानी खेळ यांवर बंदी आणली. यात भारताच्या अनेक समृद्ध शस्त्र आणि युद्ध परंपरांना कायमची ओहोटी लागली. मल्लखांब मात्र या तडाख्यात सुदैवी ठरला. मल्लखांब रूढार्थाने ‘व्यायामप्रकार’ म्हणून प्रचलित असल्याने आणि त्यात शस्त्रांचा थेट समावेश नसल्याने मल्लखांबाचा प्रसार ब्रिटिशकाळातही चालू राहिला. पुढे मल्लखांबांच्या व्यायामशाळांचा आधार घेवून अनेक सशस्त्र क्रांतीकारकांनी व्यायामाच्या पडद्याआड शस्त्रप्रशिक्षण चालू ठेवले.
ब्रिटिश काळात मल्लखांबाचा तारू तोलणाऱ्यांमध्ये अध्वर्यू होते ते म्हणजे ‘बाळंभट्ट देवधर’! बाळंभट्ट देवधर हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पदरी असणारे व्यायाम, शस्त्रविद्या यांचे गाढे अभ्यासक आणि प्रशिक्षक होते. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांचे बाळंभट्ट हे गुरू! दुसरे बाजीराव पेशवे १८१८ नंतर जेव्हा बिठूर, वाराणसीला राहायला आले तेव्हा तेथपर्यंत येतेसमयी त्यांनी देवधरांच्या सहाय्याने पुणे ते वाराणसी या मार्गात अनेक आखाड्यांची स्थापना केली आणि पारंपरिक व्यायाम आणि शस्त्रविद्या यांचा प्रचार, प्रसार चालू ठेवला आणि यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण आणि सराव केंद्रस्थानी होता. बाळंभट्ट देवधर आणि त्यांची तीन मुले रामजी, लक्ष्मण आणि नारायण यांनी उत्तर भारतात, विशेषकरून गुजरातमध्ये मोठा शिष्यवर्ग निर्माण केला. बाळंभट्ट देवधरांचे पट्टशिष्य टक्के जमाल यांनी ‘जुम्मादादा’ यांना देवधरांच्या मल्लखांब आणि शस्त्रविद्येचा वारसा दिला ज्यांनी बडोद्यामधल्या प्रसिद्ध ‘जुम्मादादा आखाडा’ (नंतरच्या काळातील श्री जुम्मादादा व्यायाम मंदिर) महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राजाश्रयामध्ये चालू केला. बाळंभट्ट देवधरांचे दुसरे शिष्य ‘दामोदर गुरू मोघे’ यांनी वेतावरच्या मल्लखांबाचा शोध लावला आणि त्याचा प्रसार मध्यप्रदेश मधल्या उज्जैन, इंदोर आणि इतर अनेक भागांमध्ये केला.
बाळंभट्ट देवधरांचे मल्लखांबासाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे अनेक ठिकाणांच्या आखाड्यांच्या स्थापनेतून त्यांनी मल्लखांब व्यायामप्रकार सर्वसामान्यांसाठी ‘accessible’ केला. देवधरांच्या आधी भारताच्या विविध भागात स्थानिक स्वरूपात असणाऱ्या या खेळाला देवधरांमुळे एक व्यापक आणि एकसंध स्वरूप मिळाले. भारतभरात मल्लखांबाचे प्रचलित असलेले अनेक प्रकार, शैली, पद्धती यांना एका छताखाली आणून एकप्रकारे ‘standardization’ करण्याचे महत्वपूर्ण काम बाळंभट्ट देवधरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केले. पुढे १९३०-४० च्या काळात दत्तात्रय चिंतामण करंदीकर (मुजुमदार) यांनी ‘व्यायाम ज्ञानकोशा’ तून मल्लखांब प्रशिक्षण आणि सरावाच्या तत्कालीन पद्धतींचे लिखित दस्तऐवजीकरण केल्याने स्वातंत्र्योत्तर काळात मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळाचे स्वरूप आणि स्थान प्राप्त करून देण्यामध्ये मोलाची मदत झाली.
भारतातल्या प्राचीन मल्लखांबाचा प्रवास ब्रिटिशकाळात, अगदी तत्कालीन भारतीय सैन्यामध्येही चालू होता. मल्लखांब भारताच्या अनेक भागात खेळला जात असला, तरीही भारतीय सैन्यामध्ये याची ओळख निर्माण झाली ती तत्कालीन मराठा बटालियनमुळे. १७६८ साली 1st Batallion, Bombay Sepoys मधून स्थापन झालेल्या रेजिमेंटमध्ये (ज्यात कालांतराने वेगेवगेळे युनिट्स जोडले जात Maratha Light Infantry तयार झाली) रेजिमेंटचे स्थानिक व्यायाम, खेळ म्हणून मल्लखांब, दांडपट्टा, भालाफेक यांची प्रात्यक्षिके आणि सराव निमित्तांनी सादर केले जात असल्याच्या नोंदी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लिखाणात तसेच छायाचित्रांमध्येही सापडतात. बॉम्बे जिम्नॅस्टिक्स इंस्टिट्यूटचे कॅप्टन डॉ. कल्याणपूरकर यांनी इन्स्टिट्यूट मधले आणि अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळातले विद्यार्थी यांना सोबत घेवून मल्लखांबाची प्रात्यक्षिके १९३६ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हिटलरच्या समोरही सादर केली होती. १९२० ते १९४० याकाळात अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळाने जर्मनी, फ्रान्स, इराण, जपान, फिनलँड अशा अनेक देशांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.
मल्लखांबासारख्या पारंपरिक व्यायामप्रकाराने अनेक शतके परकीय आक्रमणे, मर्दानी खेळांवरील बंदी या सर्वांतून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काही दशके या खेळाला, व्यायामप्रकाराला शासकीय पातळीवर मोठी अनास्था आणि अवहेलना सहन करावी लागली. अण्णासाहेब खानविलकर, एस. रत्नम, अ. य. साठे, पंडित विश्वनाथ यादव, सरदार पृथ्वीसिंग आझाद, रामदास कल्याणपूरकर, शशिकांत व्यास, सुहास पाठारे, लीलाधर कहार अशा अनेक मल्लखांबाला समर्पित व्यक्तींच्या आणि आखाडे, व्यायामशाळा यांच्या एकत्रित प्रयत्नातून सरकारदरबारी मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळ म्हणून ओळख मिळवून देण्यात दोन-तीन दशकात यश आले. आजच्या काळात मल्लखांब त्याच्या विविध प्रकारांसह (दोरी, वेत, तरंगता इ.) देशभरात आणि देशाबाहेरही अभिमानाने खेळला जातो. कित्येक शतकांची समृद्ध परंपरा असणाऱ्या या व्यायाम + खेळाचा प्रेरक इतिहास लिखित, audio-visual माध्यमातून नव्या पिढीपुढे मांडणे, त्यांना हा पारंपरिक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणे हेच या पारंपरिक खेळासाठी दिलेले योग्य आणि शाश्वत योगदान असेल.

गिरिजा दुधाट

संदर्भसूची:

1] Ghosh, A. (ed.) (1957). ‘Indian Archaeology, 1956-57: A review’, Department of New Delhi: Archaeology.
2] Shrigondekar, G.K. (ed.) (1925). Manasollasa Vol. I to III, Vadodara: Gaekwad Oriental Series.
3] Sondesara, B.J. (ed.) (1964). Mallapuarana: A rare sanskrit text on Indian wrestling especially as practised by the Jyesthimalla. Vadodara: Gaekwad Oriental Series.
4] Watters, T. (1904). Davids, T.W. (ed). On Yuan Chwang’s travels in India: 629 to 645 AD. London: Royal Asiatic Society.
5] बाठे, मनिषा (२०१६). एक होता बाळंभट. पुणे: समर्थ मीडिया सेंटर.
6] मुजुमदार, द. चिं. (१९४२). व्यायाम ज्ञानकोश: खंड २. बडोदा: शासकीय मुद्रणालय.

Saturday, June 14, 2025

"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."

 
एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपलं. गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता.
त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्याने हार मानली नव्हती.
त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच. आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली. सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती. पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण हीच त्याची शेवटची आशा होती.
तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो जवळ गेला, त्याची आशा वाढू लागली. आणि या वेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं. ती खरंच एक झोपडी होती.
पण काय! झोपडी ओस पडलेली होती. असे वाटत होते की खूप वर्षांपासून कोणीही इथे आलेले नव्हते. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला.
आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिथे एक हँडपंप होता! पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं. तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला.
पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे. तो थकून खाली कोसळला.
तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली. कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती उघडून प्यायला लागला, तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला.
त्यावर लिहिलं होतं — "हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका."
ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी प्यावं की पंपात ओतावं.
त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले — जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण जर पंप चालू झाला तर? जर गोष्ट खरी ठरली तर?
थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं. त्याने बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं.
तो हँडपंप चालवू लागला — एक, दोन, तीन वेळा — आणि अचानक पंपातून थंडगार, निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं.
त्याने भरपूर पाणी प्यायलं. त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली. त्याचं डोकं काम करायला लागलं. त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली.
तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली. त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता, ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता.
त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली. नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला.
थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं —
"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."
ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. ती आपल्याला शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये.
या कथेमधून हेही समजतं की काही मोठं मिळवायचं असेल, तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं — जसं त्या माणसाने अख्खं पाणी हँडपंपात ओतलं.
पाण्याचं या कथेत प्रतीक आहे — अशा गोष्टीचं, ज्या आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. कुणासाठी ते ज्ञान असू शकतं, कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी पैसा.
हे जे काही आहे, ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं. आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेकपट अधिक मूल्य प्राप्त करतो.
एक व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जातं — हेही ही गोष्ट आपल्याला शिकवते.
जर ही गोष्ट आवडली असेल तर ती इतरांनाही शेअर करायला विसरू नका.
साभार: फेसबुक



Friday, June 13, 2025

किल्ले रायगडाचा आजपर्यत पाहीलेला सर्वांग सुंदर फोटो


 

𝐓𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰 𝐢𝐬 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐢𝐬𝐞𝐝.

Pratik Joshi had spent the last six years in London, working hard as a software professional, holding on to a dream — to one day bring his wife and three young children from India to join him and build a better life together abroad.
That dream was finally coming true. Just two days ago, his wife, Dr. Komi Vyas, a respected doctor in Udaipur, resigned from her job. The family had packed their bags, said their goodbyes, and looked ahead with hope in their hearts.
This morning, filled with excitement, they boarded Air India flight 171 to London. They took a selfie, smiling wide, and sent it to their loved ones — a snapshot of a new beginning.
But they never made it.
The plane crashed. No one survived.
In an instant, a lifetime of plans, dreams, and love was gone. A harsh, heartbreaking reminder that life is painfully fragile. Everything we hold dear — our families, our futures, our happiness — can disappear in a blink.
So while you still can, live fully. Love deeply. Be present. Don’t keep waiting for the perfect time to start living.
Because tomorrow is never promised.








School In India in 1862


 

View from Golconda Fort towards Hyderabad— 1928. Latest photo in the comments section.


 

1860 Colonial Era India, Maharashtra, Bombay (Mumbai). The interior of the Old Fort, Bombay. Photographer unknown. Restored Image.


 

Friday, June 6, 2025

Tarikh-i Hind تاریخِ ھند #TarikhiHind










Situated atop the rugged hills of Bijapur, India, this imposing cannon, known as the Malik-e-Maidan, was forged from one piece of copper in the late 16th century during the reign of the Muslim Adil Shahi dynasty. As one of the largest surviving medieval cannons.