Tuesday, May 13, 2025

अमीर खुसरो



अमीर खुसरोच्या काही प्रतिमा, उदाहरणे, उपमा या आधुनिक राष्ट्रविषयक काव्यलेखनाच्या खूप पुढच्या आहेत. उदाहरणादाखल त्यांच्या भारतप्रेमावरच्या काही कविता-
"हस्त मेरा मौलीद व मावा वतन"
(हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे.)
दुसऱ्या एका कवितेत खुसरो म्हणतात-
"किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन"
(भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे.)
देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे. हे सांगताना खुसरो म्हणतात,
"दीं ज रसूल आमदाहे काई ज मरा दीन"
(कारण, प्रेषितांनी म्हटलय' हुब्बुल वतन मन उल इमां' अर्थात देशाशी प्रेम करणे इमानचा भाग आहे.)
देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे. नुह सिपेहर ही खुसरोंची प्रख्यात मसनवी त्यामध्ये खुसरो भारतावरील आपले प्रेम प्रकट करताना म्हणतात,
"गर वतन अज हिंद हासिल-ए-ऊ बाज ब फिरदौस शुदी मंजिल -ए-ऊ"
खुसरो इतिहासाचे अभ्यासक होते. या काव्यपंक्तीत खुसरो म्हणतात, (इतिहासातील) विश्वसनीय संदर्भाच्या आधारे हे स्पष्ट होते की, भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे.
"हिंद चू अज खुल्दनिशा बूद दरु
भारत देश विविध वैशिष्ट्यांनी बनलेला आहे. या देशातील नानाविध रूपांवर आपल्याला अभिमान वाटत असल्याचे खुसरोंनी नुह सिपेहरमध्ये सांगितले आहे. खुसरो राष्ट्रनिष्ठ होते तसे ते राष्ट्रऐक्याचे गीत गाणारे राष्ट्रकवीदेखील होते. त्यांनी एका कवितेत म्हटलंय-
"बरुं शुद दुई अज सरे तुर्क व हिन्दू के हिन्दोस्तान बा खुरासा यके खुद"
हिन्दू आणि तुर्क ही भेदाची भावना सोडून हिंदोस्तां आणि खुरासान एक झाले आहेत. भारत हा माणसांचा देश आहे. येथे धार्मिक भेदाभेद करणे योग्य नाही. त्यामुळे माणसांचा देश असणाऱ्या भारतातील धार्मिकद्वेषाला नाकारून खुसरो सहिष्णूतेचा संदेश देतात. (पृष्ठ क्र. 11, 12)
अशाप्रकारे शेकडोवर्षे हिंदू-मुसलमान या भूमीत गुण्यागोविंदाने एकत्रपणे नांदत आहेत... एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. म्हणूनच येथील संस्कृतीला गंगाजमुनी संस्कृती असे म्हटले जाते. जे बाहेरून आले ते तर इथले झालेच, पण जे इथे जन्मले ते मुळातच या भूमीतले होते. म्हणून त्यांना या भूमीविषयी प्रेम होतेच. ज्यांना ते दिसत नाही ते राजकारणाच्या मतलबापोटी परस्परांमध्ये तेढ वाढवून धार्मिक ध्रुवीकरण करून आपली राजकीय पोळी भाजत असतात. त्यात बळी जातात ते सामान्य माणसाचेच.






No comments:

Post a Comment