आझाद हिंद सेनेचे हे सैनिक निर्दोष मुक्त झाले.



दुसरं महायुद्ध संपल्यावर इंग्रजांनी आझाद हिंद सेनेच्या ७६०० सैनिकांवर खटले चालवायचं ठरवलं.
या सैनिकांचा बचाव करण्यासाठी नेहरूंनी ' आझाद हिंद सेना डिफेन्स कमिटी ' स्थापन केली ज्याचे अध्यक्ष भुलाभाई देसाई होते.
समितीमध्ये स्वतः नेहरू, के.एन. काटजू, तेज बहादूर सप्रु असे अनेक नामवंत वकील होते.
प्रेमकुमार सहगल, शाहनवाज खान आणि गुरुबक्षसिंग ढिल्लो यांच्या विरोधात रेड फोर्ट ट्रायल नावाने प्रसिद्ध खटला लाल किल्ला कोर्टात सुरू झाला.
अनेक वर्षे अडगळीत पडलेला वकिलीचा कोर्ट पुन्हा चढवून नेहरू स्वतः युक्तिवाद करायला वकील म्हणून उभे राहिले.
आझाद हिंद सेनेचे हे सैनिक निर्दोष मुक्त झाले.
हे सगळं सुभाषचंद्र बोस अपघातात मरण पावल्यावर झालं.

No comments:

Post a Comment