A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
सडेतोड पु. ल. देशपांडे
● *काही आसपासची वयोवृद्ध मंडळीही 'काय म्हणतोय तुझा तो गांधी' असं विचारून 'एकूण सगळा पोरखेळ चाललाय' असा शेरा मारून आम्हाला डिवचून जायचे.
● हिंदुत्ववाल्यांपैकी बहुतेकांचा 'आपण टिळक संप्रदायातले आहोत' असाही गैरसमज होता.
*गांधींच्या चळवळीतले सामर्थ्यच त्यांच्या लक्षात येत नसे.
● *गांधींचा मुसलमान धाजिर्णेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. गोऱ्या सार्जटांनी किंवा सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधापेक्षा, मुसलमान गुंडांनी केलेल्या बलात्काराच्या वेळी त्यांच्या वाणीला आणि लेखणीला जोर चढे!
● *हिंदू-मुसलमानांच्या दंग्यात कधी ही मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणावं, तर तेही नव्हतं.
● हिंदू-मुसलमानांच्या दंग्यात मुंबईत आमचे कोकणी रामा आणि गिरणमजूर गुंडांची टाळकी सडकायला बाहेर पडत. सोडावॉटरच्या बाटल्यांची 'फ्री फाईट' होई. तिथे सरळ 'तू माझे डोके फोडतो की मी तुझे ते बघू या' हा कायदा होता.
● *पण हे हिंदूधर्मरक्षक मात्र हवेत लाठी फिरवून गनिमांची टाळकी फोडण्याची दिवास्वप्ने पाहत होते.*
● *मुंबईत दंगा उसळला होता. पार्ल्यात एखादा बत्तीवाला किंवा छत्रीदुरुस्तीवाला आणि काचवाला बोहरी वगळला तर मुसलमानांचा संबंध नव्हता. पण इथे 'आत्मरक्षणा'साठी हिंदू मंडळींनी गस्त सुरू केली.*
● *सगळे डॉन क्विक्झोटचे भाऊ! उगीचच रात्री-अपरात्री लाठ्या आपटीत हिंडायचे. गनीमांशी लढायला मोक्याच्या जागी मोर्चे बांधावे लागतात म्हणून बंगल्याच्या गच्यांवरून पहारा !*
● आम्ही मित्रमंडळी कसलातरी कार्यक्रम आटपून रात्री परतत होतो. जोरजोरात गप्पागोष्टी करीत येत होतो.
● *इतक्यात गच्चीवरून हिंदुत्वरक्षकाची आरोळी आली, 'शत्रू की मित्र ?'*
*आम्ही ओरडलो 'शत्रू !'*
आता वर पेच पडला होता, 'शत्रू' असा प्रतिवाद आला आहे, आता पुढे काय करायचे.
दोन-चार मिनिटे बालेकिल्ल्यात स्तब्धता होती.
पुन्हा आम्ही ओरडलो, 'शत्रू!'
*वरून आवाज आला... 'जाss'*
*- पु. ल. देशपांडे*
खिल्ली /
एका गांधी टोपीचा प्रवास /
पान क्रमांक - ५,६
इलाहाबाद से प्रतापगढ़ जाने वाली कैमल कार्ट ये डबल डेकर है। हिन्दोस्तान में इस तरह की सवारी 18वी सेंचुरी के आखिर तक लंबे सफर के लिए इस्तेमाल की जाती थी।
#mughal_saltanat
सेनानी साने गुरुजी
महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या "शामची आई" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली.
आंतरभारतीचे स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण सर्व भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. असं म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असंच झालं आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींचं जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवणं हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे असं झालं असेल का?
चले जाव आंदोलनातील साने गुरुजी
ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ ऑगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते. परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या लढ्यात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला.
आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान,
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,
कामकऱ्यांच्या राज्यासाठी,
लावू पणाला प्राण!
हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत हजारो शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत दिल्लीच्या सिमेवर तळ ठोकून आवाज उठवत आहेत. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असुनही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकारची ही असंवेदनशीला निष्क्रीयता निषेधार्ह आहे. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.
प्रताप मिलच्या कामगारांचा लढा
अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. कॉंट्रॅक्ट लेबर नावाच्या राक्षसानं कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. इथेही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने कामगार कायद्यात घातक बदल करुन कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार हिरावून घेण्याचं काम चालवलय. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेलं विषमतेचं भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आलं. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता यावं यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याचं बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हवं.
पंढरपूर मंदीर प्रवेश सत्याग्रह
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेले प्राणांतिक उपोषण हा त्यांच्या जिवीतकार्यातील महत्वाचा टप्पा आहे. जन्माधिष्ठीत उच्च-निचतेवर आधारलेल्या चातुर्वण्य व्यवस्थेतील अन्याय व शोषण हा कुठल्याही संवेदनशील व समताप्रेमी माणसाला अस्वस्थ करणारा विषय. साने गुरुजींसारख्या भावूक आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीने अशा मुद्द्यासाठी आपले प्राण पणाला लावायचा निर्धार करावा हे सुसंगतच मानले पाहिजे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद जोरात होता. म. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही आघाड्यावरील कार्यक्रम व उपक्रमांची अशी काही सांगड घातली की तो वादच अप्रस्तुत ठरला. साने गुरुजी आणि त्यांचे समाजवादी सहकारी गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. बेचाळीसच्या लढ्याची धामधुम कमी होताच आणि भारताचे राजकीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच गुरुजींनी सामाजिक समतेच्या लढ्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा महत्वाचा सत्याग्रह हातात घेतला. यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासह महाराष्ट्राच्या गावोगावी जावून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजमनाला साद घातली. कलापथकाच्या प्रबोधनामुळे अनेकांची पारंपारिक भूमिका बदलली. काही थोडे जण मात्र अधिक कर्मठ बनले. साने गुरुजींनी पंढरपुरच्या वाळवंटात प्राणांतिक उपोषण सुरु केले.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ!
या संत तुकारामांच्या भुमिकेची आठवण सर्वांना आणि विशेषतः विरोध करणाऱ्या बडव्यांना या सत्याग्रहाने करुन दिली. पंढरीचा विठ्ठल हे बहुजनांचे दैवत. समतेचा पुकारा करणाऱ्या बौद्ध परंपरेशी नाते सांगणारा हा देव. पूरोहितशाहीच्या पोटापाण्याचा आधार म्हणून रुजवलेल्या कुठल्याही निरर्थक कर्मकांडाला वारकरी परंपरेत थारा नाही. भक्तांच्याकडून केवळ नामस्मरणाची अपेक्षा सांगणाऱ्या परंपरेतील हा देव आहे. आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या भक्ताला आपल्या कामातच पांडुरंग भेटेल असं आश्वस्त करणाऱ्या परंपरेतील हा देव. अशा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केवळ जातीच्या आधारावर काही जणांना प्रवेश नाकारणे हे म्हणजे वारकरी परंपरेच्या विरोधातील भूमिका. साने गुरुजींची भूमिका महाराष्ट्राच्या समाजमनाने उचलून धरली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व भावा-बहिणींसाठी खुले झाले. देशाचे स्वातंत्र्य वेशीवर आलेले असताना साने गुरुजींचे हे उपोषण नव्या भारतासाठी दिशा दिग्दर्शक होते. येऊ घातलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक समतेच्या मुल्याचं जमीनीवरील ते प्रात्यक्षिक होतं. आज साने गुरुजींची आठवण काढताना मनात अनेक प्रश्न आहेत. एकविसाव्या शतकात मंदिरप्रवेशाचा मुद्दा अप्रस्तुत ठरलाय. पण अन्यायकारी व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीव्यवस्थेचा मुद्दा तर कायम आहे. सरकारे बदलली तरी जातीय अत्याचार सुरुच आहेत. जातीअंताची लढाई आज वेगळ्या टप्प्यावर नेण्याची गरज आहे. जातीय अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनातील गुन्हेगारांना वेळेत कठोर शासन करुन कायद्याच्या राज्याचा वचक निर्माण करण्याची गरज वाढलीय. समाजात सामाजिक सलोखा हवाय तो अशा अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी नाही. सर्वांना चांगल्या शिक्षणाचा व सक्षम रोजगाराचा अधिकार मिळावा, उपजिवीकेच्या साधनांच्यापर्यंत सर्वांची पोहोच वाढावी या आघाड्यावर सामाजिक समतेची लढाई ताकदीने लढण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.
साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनी
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
असं सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया..!!!
Subhash Ware सरांच्या वॉलवरून..
साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!!
इस्लाम: आधुनिक युग का निर्माता
भौतिक विज्ञान14 वीं सदी तक इस अनुवाद-कार्य का सिलसिला जारी रहा। न केवल अल-राज़ी, इब्न सीना (Avicena) और इब्न रूश्द (Averroes) इत्यादि की पुस्तकें, बल्कि गैलेन (जालीनूस), हिप्पोक्रेट्स, प्लेटो, अरस्तू, यूक्लिड्स और टॉलेमी इत्यादि की पुस्तकों का भी अरबी भाषा से लैटिन भाषा में अनुवाद किया गया। डॉक्टर गिलकिर्क ने उस समय के इतिहास पर लिखी अपनी पुस्तक में तीन सौ से अधिक अरबी पुस्तकों का लैटिन भाषा में अनुवाद होने की चर्चा की है।
तमद्दुन-अरब
दूसरे पश्चिमी विद्वानों ने और अधिक स्पष्ट रूप में इस ऐतिहासिक सच्चाई को स्वीकार किया है। उदाहरण के तौर पर– रॉबर्ट ब्रिफॉल्ट ने लिखा है कि यूनानियों ने सिस्टम पैदा किया, इसके आम प्रयोग का विचार दिया, नियम और सिद्धांत निर्धारित किए, लेकिन लंबे समय के अवलोकन की मेहनत और जाँच प्रयोग द्वारा खोज का काम यूनानी स्वभाव के लिए बिल्कुल अजनबी था।
वैज्ञानिक प्रगति के प्रसिद्ध इतिहासकार जॉर्ज सार्टन लिखते हैं कि जिस चीज़ को हम विज्ञान कहते हैं, इसकी मूल और सबसे बड़ी कामयाबी, जो बाद की वैज्ञानिक गतिविधियों को बढ़ावा देने का कारण बनी, वह व्यावहारिक जाँच-प्रयोग, अवलोकन, अनुभव और हिसाब के नए तरीकों के परिणामस्वरूप पैदा हुई थी और इसे मूल रूप से मुसलमानों द्वारा अस्तित्व में लाया गया। जाँच प्रयोग की यह भावना 12 वीं सदी तक बनी रही और यह चीज़ यूरोप को अरबों के माध्यम से मिली।
इस प्रकार की जानकारी देते हुए ब्रिफॉल्ट ने कहा है कि हमारे विज्ञान पर अरबों का जो अहसान है, वह केवल यह नहीं है कि उन्होंने हमें क्रांतिकारी दृष्टिकोण के बारे में आश्चर्यजनक खोजें प्रदान की, बल्कि विज्ञान इससे भी अधिक अरब संस्कृति का एहसानमंद है, वह यह कि इसके बिना आधुनिक विज्ञान का अस्तित्व ही न होता।
_Briffault, Making of Humanity, p-190_
ब्रिफॉल्ट के इन व्यख्यानों को वैज्ञानिक प्रगति और विकास के प्रसिद्ध इतिहासकार जॉर्ज सार्टन ने मज़बूती दी है। इस्लामी सभ्यता और मुसलमानों के कामों ने वैज्ञानिक इतिहास की धारा को किस प्रकार प्रभावित किया, उनके इस योगदान को जॉर्ज सार्टन ने अपनी पुस्तक ‛हिस्ट्री ऑफ़ साइंस’ के तीन खंडों में दर्शाया है।
_Introduction to the History of Science, 3 Volumes, George sarton. Baltimore, Williams and Walkins, 1945_
जॉर्ज सार्टन ने लिखा है कि मध्ययुग की मूल और सबसे बड़ी सफलता जाँच-प्रयोग की भावना को पैदा करना था। जाँच-प्रयोग और अनुसंधान की यह भावना वास्तव में मुसलमानों ने पैदा की, जो 12 वीं सदी तक जारी रही और यह चीज़ यूरोप को अरबों के माध्यम से मिली। निःसंदेह आधुनिक विज्ञान आधुनिक दुनिया के लिए इस्लामी सभ्यता की सबसे बड़ी और महानतम देन है।
शिवकालीन होन
रायगडावरील यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्मिळ असे शिवकालीन होन मिळाले.
REVENGE
An old man said these words to Noam Chomsky, who reported it in 2012: “You take my water, burn my olive trees, destroy my house, take my job, steal my land, imprison my father, kill my mother, bombard my country, starve us all, humiliate us all, but I am to blame: I shot a rocket back.”
In 2006, Palestinian poet Talha Muhammad Ali wrote this poem, one that has stayed with me always since I first read it a decade ago.
Between these two is contained the breadth and the fire of the Palestinian resistance, and in its refusal to be erased either from the geopolitics of this earth and from the human condition and the individual call to humanity itself, it can never be exterminated.
#FromtherivertotheseaPalestinewillbefree
_________
इन्तेक़ाम
तहा मुहम्मद अली
कभी कभी... जी चाहता है कि
मैं उस आदमी से भिड़ सकूँ
जिसने मेरे वालिद का क़त्ल किया
और मेरे घर को ढाकर, मुझे
एक तंग से देश में खदेड़ दिया.
अगर वो मुझे मार डाले
तो मुझे आख़िरकार सुकून मिले,
और अगर मेरी पूरी तैयारी हुई--
मैं उससे बदला लूंगा.
*
पर अगर, जब मेरा दुश्मन मेरे सामने आये,
यह उजागर हो,
कि उसकी एक माँ है जो उसका इंतेज़ार कर रही है
या एक पिता जो
दाएं हाथ से अपना सीना थाम लेता हैं
अगर उनका बेटा पंद्रह मिनट भी उनकी मुलाक़ात के लिए देर से आये
तब मैं उसकी हत्या नहीं करूँगा
पाऊँ भी तो.
*
जैसे ही... मैं उसका क़त्ल नहीं करूँगा
अगर ये जल्द ही साफ़ हो जाय कि
उसके भाई या बेहेन हैं
जो उस से बेहद प्यार करते हैं
और उसे देखने की लिए तड़पते रहते हैं
या उसकी एक बीवी है जो उसका सत्कार करती है
या बच्चे जो उसकी नमौजूदगी बर्दाशत नहीं कर सकते
और जिन्हें उसके तोहफे भरपूर ख़ुशी देते हैं.
या अगर उसके हों कोई दोस्त या पड़ोसी
या जेल या हस्पताल के कोई रफ़ीक़
या स्कूल के कोई सहपाठी
जो लेते रहते है उसकी खबरें
और भेजते रहते हैं उसको सलाम.
*
पर अगरचे वो बिलकुल अकेला ही निकला
— पेड़ से कटी हुई शाख़ की तरह अलैहदा--
— बिन माँ-बाप के, कोई भाई-बेहेन नहीं,
पत्नीविहीन, बिना कोई बच्चे के,
और रिश्तेदारों, पड़ोसी, दोस्तों, सहयोगियों, साथियों के बग़ैर,
मैं उसकी एकाकी के दुःख में एक ज़र्रा भी नहीं जोड़ूंगा—
न तो मौत की अज़ाब
न तो गुजर जाने का ग़म.
इसके बदले, में संतुष्ट रहूंगा
उसे कोई ध्यान न देते हुए उसके पास से गुज़र जाऊंगा
—अपने आप को मनाते हुए कि
उसे ऐसे नज़रअंदाज़ करना
अपने आप में एक किस्म का इन्तेक़ाम है.
(Translated by Ayesha Kidwai, May 2020)
_____________
REVENGE
Taha Muhammad Ali
2015
At times ... I wish
I could meet in a duel
the man who killed my father and razed our home, expelling me
into
a narrow country.
And if he killed me,
I’d rest at last,
and if I were ready—
I would take my revenge!
*
But if it came to light, when my rival appeared, that he had a mother waiting for him,
or a father who’d put
his right hand over
the heart’s place in his chest whenever his son was late even by just a quarter-hour for a meeting they’d set— then I would not kill him, even if I could.
*
Likewise ... I
would not murder him
if it were soon made clear
that he had a brother or sisters
who loved him and constantly longed to see him. Or if he had a wife to greet him
and children who
couldn’t bear his absence
and whom his gifts would thrill.
Or if he had
friends or companions,
neighbors he knew
or allies from prison
or a hospital room,
or classmates from his school ... asking about him
and sending him regards.
*
But if he turned
out to be on his own—
cut off like a branch from a tree— without a mother or father,
with neither a brother nor sister, wifeless, without a child,
and without kin or neighbors or friends, colleagues or companions,
then I’d add not a thing to his pain within that aloneness—
not the torment of death,
and not the sorrow of passing away.
Instead I’d be content
to ignore him when I passed him by
on the street—as I
convinced myself
that paying him no attention
in itself was a kind of revenge.
(Translated by Peter Cole, Yahya Hijazi, and Gabriel Levin, 2015)
Hindi in Roman
Inteqaam
Taha Muhammad Ali
Kabhi kabhi... ji caahtaa hai
Main us aadmi se bhiR sakuun
Jisne mere waalid ka qatl kiyaa
Aur mere ghar ko dhaakar, mujhe
Ek tangg se desh mein khadeR diya
agar wo mujhe maar daale
To mujhe aakhirkar sukuun mile
Aur agar merii puurii taiyyari hui
Main us de badlaa luungaa.
*
Par agar, jab meraa dustman mere saamne aaye, ye ujaagar ho
ki uskii ek maaN hai jo
uskaa intezaar kar rahi hai
Ya ki ek pitaa jo
Daayein de apnaa siinaa thaam letaa hai
agar unkaa beTaa pandraah minit bhi unki mulaakat ke liye der de aaye
Tab main uskii hatyaa nahiin karungaa,
PaauuN bhi to.
*
Jaise ki... main uska qatl nahiin karuunga
Agar ye jald hi saaf ho jaaye ki
uske bhaii ya behen hain
jo us se behad pyaar karte hain
Aur use dekhne ke liye taRapte rehte hain
Ya uski ek biwi hai jo uska satkaar karti hai
Ya bacce, jo uski namaujudagi bardasht nahiin kar sakte
Aur jinhein uske tohfe bharpuur khushi dete hain.
Ya agar uske hoN koi dost ya paRosi
Ya jel ya haspatal ke koi rafiq
Ya skuul ke koi sahpaathi
Jo lete rehte hain uski khabrein
Aur bhejte rehte hain usko salaam
*
par agarche vo bilkul akela hi niklaa
— peR de kati hui shaakh ki tarah, alayhdaa
— bin maaN-baap ke, koi bhai-behen nahiin
Patni viheen, binaa koi bacce ke
Aur rishredaaroN, paRosiyoN sahyogiyoN, saathiyoN ke baghair
Main uski ekaaki ke dukh mein zarra bhi nahiin joRungaa
— naa to mauth ka aazaab
Naa to guzar jaane kaa gham.
Iske badle, main santusht rahuungaa
Use koi dhyaan na dete hue uske paas de guzar jaaungaa
--apne aap ko manaate hue ki
Use aise nazarandaaz karnaa
Apne aap mein ek kism ka inteqam hai
LAUGHTER SHOW
पेशंट : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत....
डॉक्टर: "अहो त्या गोळ्या नाहीयेत.
मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!
पेशंट: अबे बयताडा... त्या गोळीच्या नादात 52 मेडिकल फिरलो ना मी बोक्या
तरीपण एक - मेडिकल वाला म्हणला उद्या मागवून देतो .
" निसर्ग मित्र व्हा "
भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
" निसर्ग मित्र व्हा "
गुजरात मॉडेलने देशाला पंतप्रधान दिला महाराष्ट्राने देशाला काय दिले?
Source : "Max Maharashtra"
महाराष्ट्र राज्याच्या नावातच राष्ट्र आहे तसे भारतातल्या इतर कुठल्याही राज्याच्या नावात नाही. त्यामुळे राष्ट्राला दिशा देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी इतर राज्यांच्या तुलनेत मोठी आहे आणि महाराष्ट्र ती गेल्या साठ वर्षांपासून यशस्वीरित्या निभावतोय. हे 'नावात काय आहे?' या शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध वाक्याला फाट्यावर मारत आपण महाराष्ट्रीयन लोक अभिमानाने म्हणू शकतो. आज 'महाराष्ट्र दिन', महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. त्यानिमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!!
साधारण एक नऊ-दहा वर्षांपूर्वी अचानक 'गुजरात मॉडेल'ची जाहिरातबाजी सुरू झाल्याचे आपणा सर्वांना आठवत असेल.
मोदींच्या नेतृत्वात गुजरातने इतर राज्यांच्या तुलनेत कशी प्रगती केली आणि तशीच प्रगती देशाची व्हायची असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. अशी हवा २०१३ सालापर्यंत तयार करण्यात आली आणि परिणामस्वरूप मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले आणि २०१४ साली बहुमत मिळवून भारताचे पंतप्रधानही झाले. हा इतिहास मी यासाठी सांगतोय की, तथाकथित 'गुजरात मॉडेल' ची वाहवा होत असताना, त्यापूर्वी, त्यानंतर आणि आजही आपला महाराष्ट्र गुजरातच्या बराच पुढे होता आणि आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात जास्त होता आणि आजही आहे.
औद्योगिकरणातही महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता आणि आहे. अशा प्रगतिशील महाराष्ट्र राज्याने किंवा राज्याच्या नेतृत्वाने कधीच आपली टिमकी न वाजवता म्हणजे जाहिरातबाजी न करता कायम पुढे जाण्याचे धोरण ठेवले.
मोदींच्या जाहिरातबाजीला देश भुलला आणि त्यांना सत्ता दिली.
अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, मिनीमम गवर्नमेंट मॅक्सीमम गवर्नंस, आतंकवाद-नक्सलवाद से निपटारा, भ्रष्टाचारमुक्त भारत, चीन-पाकिस्तानको सबक, घरमे घुसके मारेंगे, विश्वगुरु.......वगैरे वगैरेचा फुगा फुटला आणि 'कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन' असे म्हणायची वेळ आपल्या सर्वांवर आली. हे मी सर्व यासाठी सांगतोय की, महाराष्ट्रात अनेक उत्तुंग नेते होऊन गेले, ते देशपातळीवरही गाजले, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने निरनिराळ्या पदांवरील कारकीर्द गाजवली.
१९६२ च्या चीनयुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला' असे म्हटले गेले. पुढे महाराष्ट्रातून अनेक नेते केंद्रात अनेक मोठमोठी महत्वाची मंत्रीपदे, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, लोकसभेचे सभापतीपद, राष्ट्रपतीपद भूषवून महाराष्ट्राचे देशासाठी योगदान देऊन गेले आणि अजूनही देत आहेत. इथे सगळ्यांची नावे द्यायची गरज नाही कारण महाराष्ट्रातील जागरूक वाचकांना हे सर्व नेते माहित आहेत.
मुद्दा असा आहे की, ही सर्व थोर नेतेमंडळी, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती, त्यांचे नियोजन, सर्वसमावेशक धोरण, विरोधी नेत्यांचेही ऐकून घेण्याची वृत्ती, वगैरे सर्व आपण ऐकले किंवा वाचले आहे. या पार्श्वभूमीवर आजचा महाराष्ट्र कुठे आहे? हे महाराष्ट्र दिनानिमित्त अभ्यासणे औचित्यपूर्ण ठरेल.
गेल्या जवळपास दीड वर्षापासून जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या बघता हे संकट जास्तच गंभीर आहे. या संकटात तथाकथित 'गुजरात मॉडेल' च्या भूलभुलैयाला बळी पडून भारतीय जनतेने ज्या महान नेत्याच्या हातात देशाचा कारभार दिला, त्या नरेंद्र मोदींच्या हातात संपूर्ण राज्यकारभार आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सर्वाधिकार त्यांनी आपल्याकडे घेऊन घेतले आहेत. 'सबका साथ सबका विकास' अशी दिलखेचक घोषणा करणारे आदरणीय मोदीजी लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसीवीर किंवा इतर आवश्यक औषधांचा पुरवठा, अशा अति महत्वाच्या बाबतीत राज्याराज्यांत कसा भेदभाव करतात हे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या बाबतीत तर शत्रुत्वाचीच भावना असल्यासारखे केंद्र सरकार आणि भाजपा नेते (केंद्रातील आणि राज्यातील) वागत आहेत. घोषणा करून टाकायची आणि नियोजन नंतर करायचे हे मोदी सरकार २०१४ पासून सातत्याने करत आहे. आणि कोरोना काळात तर ते पदोपदी जाणवत आहे. लसीकरण कार्यक्रमाचा फज्जा आपण सर्व बघतच आहोत. घोषणा आणि जाहिरातबाजी..... नियोजन शून्य....... परिणाम गोंधळ आणि फक्त गोंधळ.
रेमडेसीवीरबाबत फडणवीस आणि विखे यांचे प्रकरण झाले, दिल्लीत गौतम गंभीरचे प्रकरण झाले. हे सर्व भाजपाचेच नेते असावेत हा एक योगायोग. विचार करा, कोरोना काळात केंद्रात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरेंसारखे नेते असते तर त्यांनी कसल्याही बाबतीत राज्याराज्यांमध्ये असा भेदभाव केला असता का? दुर्दैवाने महाराष्ट्रातील केंद्रीय पातळीवरचे नेते किंवा मोदींचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना काहीही सुचवू किंवा सुनावू शकत नाहीत.
देशपातळीवर लोकसंख्येच्या किंवा बाधितांच्या संख्येच्या आधारावर सर्व सोयीसुविधा पुरविणे संयुक्तिक नाही का? असो. महाराष्ट्राची लोकसंख्या, परप्रांतीय कामगारांचे लोंढे आणि एकूण बाधितांची संख्या या पार्श्वभूमीवर असणाऱ्या किंवा मिळणाऱ्या साधन सुविधांचा सुयोग्य वापर करून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारपेक्षा उत्तमरित्या परिस्थिती हाताळल्याचे स्पष्ट दिसत येत आहे. जिज्ञासूंनी त्याबाबतची आकडेवारी आंतरजालावर तपासून घ्यावी.
आपले महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी, विचारी, समाजाभिमुख लोकांचे, थोर संतपरंपरा लाभलेले राज्य आहे. अशा वैभवसंपन्न राज्यात राजकारणामुळे म्हणा की काही नेत्यांच्या स्वार्थी सत्तालोलुप वृत्तीमुळे म्हणा बऱ्याच उलथापालथी झाल्यात आणि कधी नव्हे ते तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले.
'तीन तिघाडा काम बिघाडा' या म्हणीवर मात करीत उद्धव ठाकरे सर्वांना सोबत घेऊन सरकार चालवीत असताना कोरोना संकट उद्भवले आणि त्यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली. केंद्राची सापत्न वागणूक, विरोधी पक्षाचा जवळजवळ असहकार आणि माजी मुख्यमंत्र्यांचे आकांडतांडव यांच्याकडे दुर्लक्ष करीत ठाकरेंनी डॉक्टर,पोलिस,सरकारी-निमसरकारी कर्मचारी, इत्यादी लोकांच्या सहकार्याने बिकट परिस्थितीचा सामना केला. त्यांनी ज्या पद्धतीने सरकार चालवले ते बघता प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मोदींनी ठाकरेंचा आदर्श घ्यावा असे सुचवले. मुद्दा असा की देशभरातील तमाम नेत्यांमध्ये गुहांना आपल्या महाराष्ट्रातील नेत्याचेच नाव घ्यावेसे वाटावे... हा महाराष्ट्राचा महिमा आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते,
"आजच्या ह्या ऐतिहासिक क्षणी पंडित जवाहरलालजीचे आभार मानण्यासाठी मी उभा राहिलो आहे. अनंत काळपर्यंत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्याला पहिला आशीर्वाद देण्याकरता भारताचा आजचा युगपुरुष येथे आला आणि त्याने आम्हाला आशीर्वाद दिले. महाराष्ट्राच्या लाख लाख जनतेतर्फे मी जवाहरलालजींचे लाख लाख आभार मानतो. महाराष्ट्रातील आम्हा माणसांचे त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर भक्ति आहे. आणि आम्ही आज त्यांना परत आश्वासन देऊ इच्छितो की, महाराष्ट्राचे हे जे राज्य निर्माण झाले आहे. ते मराठी जनतेच्या कल्याणाचे काम तर करीलच, परंतु मराठी भाषिकांच्या जवळ जे देण्यासारखे आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले आहे, जे उदात्त आहे, त्याचा त्याग जर करावयाचा असेल तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करू. कारण आमचा हा पहिल्यापासून विश्वास आहे की, भारत राहिला तर महाराष्ट्र राहील, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल.
भारताचे आणि महाराष्ट्राचे हित जेव्हा एकरूप होते तेव्हा भारतही मोठा होतो आणि महाराष्ट्रही मोठा होतो, हा इतिहास महाराष्ट्राच्या रक्तारक्तांतून भिनलेला आहे. आणि म्हणून मी गेल्या चार-आठ दिवसांमध्ये प्रतीकाच्या रूपाने सांगत आलो आहे की, भारताचे प्रतीक हिमालय आहे तर महाराष्ट्राचे प्रतीक सह्याद्री आहे. उंचउंच शिखरे असलेला बर्फाच्छादित हिमालय हे भारताचे प्रतीक आहे, तर दोनशे-दोनशे, तीनशे-तीनशे इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावर घेणारा काळ्या फत्तराचा सह्याद्री आमचे प्रतीक आहे. आणि जर कधी भारताच्या हिमालयावर संकट आलेच तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरता महाराष्ट्राचा सह्याद्री उभी करील, असे मी आपणाला आश्वासन देऊ इच्छितो."
यशवंतरावांचे वरील विचार बघितले तर महाराष्ट्र हा कायम देशाच्या भल्यासाठीच झटेल असे आश्वासनच त्यांनी दिले आहे आणि नंतरच्या अनेक नेत्यांनीही ते निभावले. गेल्या काही वर्षांपासून मोदींच्या एककल्ली आणि स्वकेंद्री राजकारणामुळे भारताचा सांघिक ढाचा ठिसूळ करण्याचे काम सुरू आहे आणि त्याला आपल्या महाराष्ट्राचे काही नेते साथही देत आहेत. पण महाराष्ट्र यातूनही सावरेल, बाहेर निघेल.
महाराष्ट्राचे देशाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत योगदान बघितल्यास 'महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगेल' अशी परिस्थिती आहे. तेव्हा आपला महाराष्ट्र सर्व बिकट प्रसंगांना सामोरे जात कारस्थानी नेत्यांचा बंदोबस्त करीत मार्ग काढेल आणि राष्ट्रालाही योग्य मार्ग दाखवेल तसेच यशवंतरावांनी राष्ट्राला आश्वासन पूर्ण करेल अशी आजच्या महाराष्ट्रदिनी अपेक्षा करायला हरकत नाही. महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!!!!
अॅड. अतुल सोनक,
जय महाराष्ट्र
How various marathi wifes fight with their husbands
Pilot's wife : Jaasta udu naka...
Teacher's wife : Mala shikau naka...
Painter's wife : Thobaad rangvin...
Dhobi's wife : Changli dhuvun kadin...
Actor's wife : Natak karu naka...
Dentist's wife : Daat todun haatat deyin...
CA's wife : Hishobaat rahaa...
Engineer's wife : Nut bolt halvun taakin...
Electrician's wife : Fuse udaala ahe ka...
And the best One...
Pandit's wife : Kana khaali ganpati kadhin...







